प्राण्यांची सहल
एकदा जंगलाचा राजा सिंह याने सर्व प्राण्यांची मीटिंग घेण्याचे ठरवले. लगेच सिंहाने ससोबा ला बोलावून घेतले. ससोबा ससोबा मी काय म्हणतो आपण सर्व प्राण्यांची सहल काढूया का ? ससोबा म्हणाला वा....! काय छान आयडिया आहे. किती मज्जा येईल. सर्व प्राणी एकत्रित सहलीला सोबत असतांना खुप धमाल करता येईल. पण सर्व प्राण्यांना माहीत कसं होणार ? की आपल्याला सहलीला जायचं आहे. मध्येच ससा बोलला सिंह मोठ्या आवाजात ओरडून म्हणतो, ‘‘ अरे ससोबा मी त्यासाठीच तर तुला बोलावले ’’ तू पटकन जाऊन सर्व प्राण्यांना सांग आज रात्रीला माझ्या गुहेमध्ये मी मिटींग घेणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना बोलवलं आहे. बरं म्हणून ससोबा तिथून निघून गेला. ससोबा उड्या मारत मारत जंगलात फिरु लागला. लांडगा, कोल्हा, हरिण, हत्ती, वाघ, चित्ता, जिराफ, घोडा, अस्वल, माकड, या सर्वांना मीटिंगसाठी निमंत्रण दिले. रात्र झाली हळूहळू सर्व प्राणी राज्याच्या गुहेमध्ये जमा झाली. राजांनी हळूच सहलीचा विषय काढला. मी काय म्हणतो, आपण सर्व प्राणी मिळून जंगलात सहलीला जाऊ या का ? सर्व प्राणी एकमेकाकडे बघून हो म्हणाले. मधेच हत्ती दादा सोंड हलवत म्हणाला पण जायचे कुठे ? ते तर आधी सांगा. लांडगा मान हलवून म्हणाला हो...! हो...! कुठे जायचे ते आधी सांगा. नाहीतर आपण माणसाच्या वस्तीत गेलो तर पकडल्या जाऊ. सर्व प्राणी मोठ्यांनी मान हलवून म्हणाले बरोबर आहे. कुठे जायचं ते आधी सांगा. तरच आम्ही सहलीला येऊ. नाही तर आम्हाला नाही यायचे सहलीला. सिंह उभा राहून मोठ्यांने म्हणतो, अरे घाबरू नका. या जंगलाचा राजा तुमच्या सोबत असणार आहे.तुम्हाला कोण पकडते मी बघतोच. आपण जंगलातच सहलीला जाणार आहोत. मानवाच्या वस्तीत नाही. उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सर्वांनी सहलीसाठी माझ्या गुहेसमोर जमा व्हायचे आहे. माझ्या परवानगीने आपण सर्वजण एकत्र सहलीला निघणार आहोत. सर्वांनी माना हलवल्या व सर्व प्राणी खुशीतच आपापल्या घराकडे निघाले. हरण उड्या मारतच रस्त्याने पळत होते. माकडांनी खूप उड्या मारल्या, हत्ती, जिराफ, लांडगा, कोल्हा, अस्वल, सर्वजण आज खुश होते. कारण सर्वांना सहलीचे निमंत्रण मिळाले होते. रात्र झाली सर्वजण शांत झोपी गेले. हत्ती दादा मात्र रात्रभर जागा होता. कधी सकाळ होईल याची वाट पहात हत्ती जागीच राहिला. सकाळ झाली सूर्यकिरणांनी जंगलात प्रवेश केला तसे ससोबा संपूर्ण तयारीनिशी उड्या मारत मारतच फिरू लागला. चला... चला... रे...! चला.... चला.... रे...! सहलीला चला. धावा.... धावा..... पळा...! धावा..... धावा.... पळा...! असे म्हणत ससोबा प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन ओरडत होता. सशाचा आवाज ऐकून लांडगा नटून थटून बाहेर आला. अस्वलाने तर मोठे जॅकेट घातले होते. हत्ती दादाने तर स्वतःच्या पाठीवर झूल घातली होती. हरीण अगदी नाकात नथ घालून मान हलवत सर्वांच्या पुढे येऊन थांबली. सशाने पायात घुंगरू बांधले होते. त्याच्या टुणुक टुणुक उड्या बरोबर घुंगरांचा आवाज येत होता. राजाच्या गुहे बाहेर सर्व प्राणी बिनधास्त येऊन उभे होते. सिंह थोड्या वेळाने गुहे बाहेर आला. सर्व प्राण्यांवर नजर टाकुन कोण कोण आले ते बघतो. सिंह हसतच म्हणाला गमंत झाली. माकड मामा आलेच नाही. ससोबा माकड मामाला नाही बोलून आणले का ? ससा म्हणाला , " मी तर सर्वांना आवाज दिला होता ". मग माकड का बर आले नसेल , म्हणून ससोबा पुन्हा टुणुक टुणुक उड्या मारत जंगलात गेले. झाडाच्या खाली उभे राहून मोठ्याने आवाज देऊ लागले. माकड मामा....! माकड मामा...! चला.... चला.... सहलीला चला...! माकडाला मात्र सहलीच्या खुशीमध्ये येवढी गाढ झोप लागली होती की, अजूनही माकड झोपेत होते. ससोबाच्या आवाजाने पटकन उठुन शेपटीला छान गोंडा बांधला.व ससोबा बरोबर उड्या मारत मारत गुहेबाहेर आले. सिंहाने सर्वांना सूचना दिल्या. जंगलात फिरताना काय काय काळजी घ्यायची हे सर्वांना सांगितले. सर्वांनी मान हलवून सूचनांचे पालन करण्याचे कबूल केले. शेवटी सशाने मोठ्याने घंटी वाजवली. व सिंहाच्या मागे सर्व प्राणी सहलीसाठी निघाले. दिवसभर सर्व जंगलात सर्व प्राण्यांनी खूप मजा केली. एकमेकांची घरे बघितली, वेगवेगळी झाडं बघितली, जंगलातील वेगवेगळी फळे, फुले, रस्ता, पाणी या सर्वांची गंमत पाहिली. आपण सर्वजण या जंगलात रहात असून कधीही एकमेकांच्या भितीने एकमेकांच्या घरासमोर आलो नाही. त्यामुळे आपण एकत्र राहतो कधी आपल्याला कळलेच नाही. अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. शेवटी दिवस मावळायला आला सर्वजण चालून चालून थकले होते. हत्तीदादा तर म्हणाला बाप रे....! मी किती थकलो. मला तर चालता पण येऊ लागले नाही. हरीण मध्येच म्हणाली , " हत्तीदादा तुम्ही तर आमच्या पेक्षा सगळ्यात मोठे " मग तुम्ही कसे काय थकले. हत्ती मध्येच म्हणाला , " अगं हरिन ताई माझं शरीर मोठे " त्यामुळे त्यामुळे मला पटापट चालताही येत नाही. मी हळूहळू चालत चालत तुमच्या सर्वांच्या मागे आज खूप थकून गेलो. मला तर कुणीतरी उचलून घ्यायला पाहिजे.हरीण मोठ्यामोठ्याने हसून म्हणाली , " हत्तीदादा अशी गंमत करू नका " आम्ही सगळे प्राणी तुम्हाला साधे उचलू शकत नाही. तर पाठीवर घेऊन कसे जाणार. अशा प्रकारे प्राण्यांच्या गमती जमती मध्ये आजचा दिवस फार आनंदात गेला होता. सगळ्यांनी सिंहाच्या गुहे बाहेरून सिंहाला धन्यवाद दिला. ससा मध्येच म्हणाला राज्याच्या परवानगीने आपल्या सर्वांना सहलीचा आनंद घेता आला, पण मी तर काल पासून किती धावपळीत होतो. सर्वांना निमंत्रण मीच दिलं, सर्वांना सकाळी उठवायला पण मीच आलो होतो. पण मला काही कुणी धन्यवाद दिले नाही. माकड मध्येच उड्या मारत म्हणाले ससोबा तुलाही खूप खूप धन्यवाद. ससोबा भाऊचा जय जयकार असो....! असे म्हणून सगळे प्राणी आपापल्या घराकडे निघून गेले. सिंहालाही आजच्या सहली मुळे खुप बरे वाटले होते. आपण सर्व प्राणी एकमेकांशी यापुढे असेच प्रेमाने वागूया. एकमेकांची भीती न बाळगता सर्वांनी एकत्र या जंगलामध्ये वास्तव करूया. असे म्हणून सिंहाने आपल्या गुहेचा दरवाजा बंद केला. सिंह शांत झोपी गेला.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment