Thursday, 19 November 2020

यात्रा (लघुकथा)

                       यात्रा (लघुकथा) 

रामपूर हे गाव नदीच्या काठावर वसलेले होते. नदीच्या एका किनाऱ्यावर हिरवीगार झाडी बहरली होती. तर दुसर्‍या किनार्‍यावर रामपुर नावाचं टुमदार गाव उभं होतं. गावातील बहुतेक तरुण शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त शहरात वास्तवास होते. गाव छोटे असल्यामुळे गावात सर्वांना काम मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे तरुण पिढी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात दोन वर्षे वाट बघत असे. सरकारी नोकरी नाही मिळाली तर शहरात खासगी कंपनीत नोकरी मिळवत असे. गावातील लोक शेती व्यवसाय करून पोट भरत असे. नदीला पावसाळ्यात दोन चार पूर गेले की, हिवाळा संपेपर्यंत नदीत पाणी वाहत असे. त्यामुळे शेतीसाठी नदीच्या पाण्याचा वापर होत होता. रामपूरची नदी म्हणजे गावातील सर्वांना देवाची देणगीच होती. शेतात हिरवा भाजीपाला, फळं, कडधान्य, ऊस, कापूस अशा सगळ्या गोष्टी शेतकरी पिकवत असे. रामपूर गावातील भाजीपाला रोजच शहरात जात असे. अन्नधान्य, फळ, भाजीपाला, दूध व पाणी यांनी रामपूर समृद्ध होते. वर्षभर गावातील लोकं कष्ट करण्यात व्यस्त राहत असे. गावात नदीच्या काठावर खंडोबाचे पुरातन सुंदर असे मंदिर होते. गावाचे ग्रामदैवत या मंदिराला समजून गावकरी खंडोबाची भक्ती करत असे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला गावात खंडोबाची मोठी यात्रा भरत असे. रामपुरची खंडोबाची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेला गावातील प्रत्येक नोकरदार, तरुण, बाहेरगावी कामानिमित्त असलेले प्रत्येक जण आठवणीने येत असे. गावातील लेकीबाळी, पाहुणे, नातलग, यांना यात्रेचे निमंत्रण आवर्जून जात असे. त्यामुळे यात्रेला सर्व नातलग, गावकरी एकत्र जमत असे. त्याचबरोबर खंडोबाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील अनेक गावकरी येत होते. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत गर्दीचे स्वरूप प्राप्त होत असे. खंडोबाचे देवस्थान ग्रामदैवत असल्यामुळे गावकरी या यात्रेच्या वेळी खंडोबाची मनोभावे पूजन करत असे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा जवळ आली होती. गावातील प्रत्येकाच्या मनात यात्रेविषयीचा आनंद झळकत होता. जशी जशी चंपाषष्टी जवळ येत होती. तसे तसे गावकरी यात्रेच्या प्रतीक्षेत होते. खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांनी मंदिराला छान रंगरंगोटी करून घेतली. यात्रा दोन दिवसावर आली होती त्यामुळे मंदिरावर लाइटिंगची रोषणाई करण्यात आली होती. या यात्रेसाठी बाहेरगावावरून वेगवेगळी दुकाने गावात येऊ लागली होती. भंडारा, प्रसाद विकणारी दुकाने, खेळणीची दुकाने, त्याचबरोबर भांडी, कपडे, किराणा अशी सगळ्या वस्तूंची दुकाने या यात्रेत येत असे. रास पाळणा, मोठीमोठी पाळणे, हात बाहुलीचा खेळ करणारी कलाकार, तमाशा कलावंत, वाघे मुरुळी, आदींनी गावाच्या बाहेर नदीकाठी जागा धरून साफसफाईला सुरुवात केली.  यात्रा दोन दिवसावर आल्यामुळे बाहेरगावी असणारी मंडळी गावावर येऊ लागली होती. गावाला शहराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात्रेसाठी गावातील मुलीबाळी नातेवाईक प्रत्येकाच्या घरी जमू लागली. खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळीने सर्व यात्रेकरूंना जागा उपलब्ध करून दिली. दर वर्षीपेक्षा यावर्षी यात्रा धुमधडाक्यात पार पडली पाहिजे यासाठी सरपंच, पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी यांची बैठक पार पडली. गावात यात्रेच्या सूचना देण्यात आल्या यात्रा जमायला सुरुवात झाली. दोन दिवसात रामपूरची यात्रा भरगच्च भरली होती.

                                      आज चंपाषष्ठीचा दिवस खंडोबाच्या मंदिरातून देवाच्या काठीची मिरवणूक निघत असते. त्यामुळे गावातील प्रत्येक बायकांनी घरासमोर शेणाचा सडा टाकून सुंदर रांगोळी काढली होती. काठीला ओवळण्यासाठी ताट घेऊन बायका आपापल्या घरासमोर उभ्या होत्या. काठीचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष खंडोबाचे दर्शन घेण्यासारखे होते. त्यामुळे काठीच्या दर्शनासाठी लोक जमू लागली होती. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! च्या जयघोषात मंदिरातून देवाची काठी निघाली. काहीजण भंडारा उधळत होते तर काहीजण खोबऱ्याचा प्रसाद उधळत होते. वाजत गाजत काठीची मिरवणूक समोर समोर सरकत होती. आजच्या या चंपाषष्ठीच्या दिवशी काठीची मिरवणूक पूर्ण गावातून मिरवूण देवाच्या मंदिरात वापस जाणार होती. चंपाषष्ठीच्या दिवसापासून सुरू झालेली ही यात्रा आठवडाभर राहत असे. रामपूर गावाची यात्रा म्हणजे एक प्रकारचा सण होता. ऐरव्ही वर्षभर वेगवेगळ्या सणांच्या पेक्षा यात्रा सर्वांना अधिक आनंद देत असे. हळूहळू यात्रा विनायकच्या घरासमोर आली. विनायक त्याची पत्नी दुर्गा व छोटा मुलगा वैभव तिघांनी काठीचे दर्शन घेतले. दुर्गाने काठीची पूजा केली. वैभवने दोन्ही मुठी भरून भंडारा उधळला. विनायकने मोठ्याने येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! असा गजर केला. विनायकने खोबऱ्याच्या प्रसादाची उधळण केली. अनेकांनी गर्दीत पटकन खाली वाकून प्रसाद वेचला. काठीचे दर्शन घेऊन ते गर्दीतून बाहेर आले. आज काठी सोबत मिरवणुकीतील लोकं भंडाऱ्याने पिवळी झाली होती. आज सगळीकडे नुसता भंडारा उधळण सुरू होती. त्यामुळे लोकं, रस्ता, अंगण सगळे पिवळे झाले होते. खंडोबाला भंडारा प्रिय असल्यामुळे सर्व भक्त मनोभावे भंडारा उधळण करत होते मध्येच दुर्गा म्हणाली, ‘‘ अहो मी काय म्हणते….! वैभवला न्या थोड्यावेळ काठीच्या मिरवणुकी सोबत ’’ त्याला यात्रेबद्दल, देवाबद्दल चार नवीन गोष्टी माहिती होईल. ऐरव्ही यात्रा जवळ आल्यापासून तो सारखा यात्रेविषयी मला विचारत होता. आई कधी आहे गं….! चंपाषष्टी. मी यात्रेत जाणार, देवाच्या काठी सोबत गावभर फेरी मारणार, भंडारा उधळणार, खोबऱ्याचा प्रसाद वेचणार. यात्रेसाठी पार उतावीळ झाला आहे तो….! अग….! लहान आहे तो, लहान मुलांना यात्रेचे कुतूहल असते की, मी लहान असताना मला ही यात्रा म्हटले की खूप आनंद व्हायचा. मी व माझे मित्र आम्ही सर्वजण दिवसभर यात्रेत फिरायचो. काठीच्या मिरवणुकीच्या दिवशी तर आम्ही सगळे भंडाऱ्याने पिवळे होऊन जायचो. संध्याकाळी घरी आल्यावर लवकर ओळखू सुद्धा येत नव्हतो. त्यावेळची मजाच खूप वेगळी होती. विनायक दुर्गाला लहानपणीचा अनुभव सांगत होता. काठीची मिरवणूक आता थोडी पुढे गेली होती. दुर्गा वैभवला घेऊन दारातच उभी होती. विनायक दुर्गाला घरात जायला सांगतो. विनायक वैभवला घेऊन काठी सोबत मिरवणुकीत सामील झाला. वैभव सहा वर्षाचा झाला होता. त्याला आता नेहमी नवीन प्रश्न पडत असे. त्याला प्रश्न पडले की, तो विनायकला विचारत असे. मिरवणुकीत आता गर्दी खूप वाढली होती.  त्यामुळे काठी हळू हळू पुढे जात होती. ऐरव्ही मंदिरात दर्शन घेणारी माणसं काठीचे दर्शन घेण्यासाठी मिरवणुकीत गर्दी करू लागली होती. वर्षभर खंडोबाच्या मंदिरात वेगवेगळे उत्सव सुरूच राहत असे. परंतु काठीची मिरवणूक वर्षभरात फक्त चंपाषष्ठीला काढत असे. काठीची मिरवणूक वर्षात एकदाच होत होती त्यामुळे या मिरवणुकीला खूप महत्व होते. आता विनायक व वैभव दोघेही भंडाऱ्याने भरून गेले होते. पिवळा भंडारा मिरवणुकीत सारखा उधळला जात होता. वैभवने मध्येच  वडिलाला प्रश्न विचारला, ‘‘ बाबा मिरवणुकीत भंडारा व खोबऱ्याचा प्रसाद का उधळतात. ’’ अरे बाळा….! अनेकजण खंडोबाला आपल्या अडीअडचणीत नवस करतात. देवाच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण झाली तर, चंपाषष्टीच्या दिवशी मिरवणुकीत लोक नवस फेडत असतात. म्हणून भंडारा व खोबऱ्याची खूप एकसारखी उधळण सुरूच असते. शेवटी लोकांना अनुभव आला असेल, मनातील इच्छा पूर्ण होतात तेव्हाच लोक एवढे एकाग्र होऊन भंडारा व खोबऱ्याची उधळण करतात. हळूहळू देवाची काठीची मिरवणूक गावभर फिरून मंदिरात आली. मंदिरात सामुहिक आरती झाली. गावातील पुंजाराम शेठला यावर्षीचा आरतीचा मान मिळाला होता. शेवटी मोठा गजर झाला. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! मंदिराच्या परिसरात भंडाऱ्याची उधळण झाली. शेवटी मंदिराच्या पुजाऱ्यांनी मनसोक्त खोबऱ्याच्या प्रसादाची उधळण केली. उपस्थितांनी खूपच खोबऱ्याचा प्रसाद वेचला. वैभव मोठ्याने म्हणत होता. बाबा….! आपल्याला वेचा खोबऱ्याचा प्रसाद….! बाबा खूप वेचा….! मला खूप आवडतो खोबऱ्याचा प्रसाद….! गर्दीत प्रसाद म्हणून विनायकने दोन खोबऱ्याची तुकडे वेचली. तो वैभवला घेऊन घरी निघाला. अरे बाळा….! हा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद कमीच असतो तो खूप खायचा नसतो. आपण उद्या यात्रेमध्ये येऊ तेव्हा तुला खूप सारा खोबऱ्याचा प्रसाद घेऊन देईल. मग तू खुशाल खात बस….! जेवढा पाहिजे तेवढा. वैभव हे ऐकून खूप खुश झाला. अरे वा….! उद्या यात्रेत जायचे. मजाच….! मजा….! येणार. बाबा मी पाळण्यात बसणार आहे बर का? हो….! हो….! धीर धर….! यात्रेत आज जायचे नाही उद्या जायचे आहे. गप्पा मारत मारत दोघेही घरी पोहोचले. ‘‘ वैभव कशी झाली काठीची मिरवणूक, मज्जा आली का बघायला. ’’ वैभव घरी आल्या आल्या दुर्गा त्याला विचारू लागली. हो आई….! खूप मजा आली. मिरवणुकीत केवढी गर्दी होती. मी तर बाबांचा हात सोडलाच नाही. सगळीकडे भंडारा उधळत होते काहीजण तर खूप खोबऱ्याचा प्रसाद उधळत होते. आई माझ्यापेक्षा मोठी मुलं खूप प्रसाद वेचत होती. काही मुलांनी तर खिसे भरून प्रसाद घेतला होता. काठीच्या दर्शनासाठी पण लोकं खूप गर्दीत शिरून दर्शन घ्यायचे. ही सगळी मज्जा मला बघता आली. आज मिरवणुकीत आई….! मी काही वेळ बाबांच्या खांद्यावर बसलो होतो. त्यामुळे मला खूप छान दिसत होते. मंदिरात आरती पण झाली. देवाचा खूप मोठ्याने जयघोष झाला. मी तर मोठ्याने म्हणत होतो. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! खूप मज्जा आली. बाबांनी तर माझ्यासाठी गर्दीत पण खोबऱ्याचा प्रसाद वेचला. वैभवने पटकन खिशातील दोन खोबऱ्याची तुकडे काढली व दुर्गाच्या हातावर ठेवली. वैभवचे बोलणे विनायक व दुर्गा कुतुहलाने ऐकत होते. यावर्षीची यात्रा वैभवमुळे अधिकच मजेत जाणार होती. दुर्गा हसत….!  हसत….! म्हणाली, चला हात पाय धुऊन घ्या. देवाला नैवेद्य दाखवा व गरम गरम जेवून घ्या. आज देवाला वरण पोळी वांग्याचे भरीत असा नैवेद्य दाखवून दोघेपण मनसोक्त जेवण करत बसली. रामपूरची यात्रा भरगच्च भरली होती. गावाला जणू शहराचे रूप आले होते. गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. म्हणता म्हणता यात्रेचे दोन दिवस निघून गेले. दुर्गा हळूच म्हणते, ‘‘ अहो आपल्याला कधी जायचे यात्रेत ’’ वैभव दोन दिवसापासून माझ्या मागे लागला. तुम्ही ऑफिसला गेले की, तो मला सारखा यात्रेत घेऊन चल म्हणतो. बरं….! जाऊ उद्या….!  तुला पण घाई झाली असेलच की, यात्रेत जायची. लहान मुलांन ऐवढाच आनंद होतो तुम्हा बायकांना….!  यात्रा म्हटले की….! विनायकच्या बोलण्याने दुर्गा लाजत….! लाजत….! आतल्या खोलीत निघून गेली. चला आता शांत झोपा. उद्या जाऊ यात्रेत, मी उद्याची सुट्टी काढली आहे. उद्या दिवसभर यात्रेत फिरूया….! तुम्हाला यात्रेत काय मज्जा करायची ती करा. असे म्हणून, लाईट बंद करून सगळेजण झोपी जातात.

                             आज सकाळी उठून दुर्गा लवकर लवकर कामे आटपून तयार होते. वैभवला लवकर उठवुन त्याची सुद्धा तयारी करून देते. तिघेही यात्रेमध्ये जायला निघतात. आज गावातील अनेक जण सहकुटुंब यात्रेमध्ये आलेले होते. काहीजण तर खूप दिवसांनी रामपूरला आले होते. यात्रेच्या निमित्ताने का होईना पण बालपणीचे मित्र यात्रेत भेटत होते. सहकुटुंब ओळख होत होती. यात्रेत अनेक वेगवेगळी दुकाने आली होती. लोकं आपापल्या गरजेनुसार वस्तू घेण्यात व्यस्त होती. वैभव मधेच म्हणाला, ‘‘ बाबा….! बाबा….! तो पहा पाळणा मला त्यात बसायचे आहे. ’’ चला….! पटकन तिकडे. वैभवच्या आनंदासाठी दुर्गा, विनायक पाळण्यात बसतात. खूप उंचच उंच पाळणा होता तो….! पाळणा वरती गेला की, सगळे रामपूर दिसायचे. नदी, गाव, मंदिर व मोकळ्या जागेत भरलेली मोठी यात्रा स्पष्ट दिसत होती. पाळणा खूप वेगात आल्यावर तर दुर्गांनी डोळे लावून घेतले. तिला भीती वाटू लागली होती. वैभव मात्र मोठ्या मोठ्याने ओरडत पाळण्याचा आनंद घेत होता. शेवटी पाळणा खेळून झाला. तिथले अनेक छोटी छोटी पाळणे वैभवला खेळु दिली. लहान मुलांना पाळणा खेळण्याचा खूपच आनंद असतो. वैभवच्या त्या आनंदाने विनायकला बालपणाची आठवण करून दिली. मी लहान असताना आठही दिवस मित्रांसोबत यात्रेत फिरायचो. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे घरचे पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे यात्रेत काही खाणेपिणे, खेळणी घेणे, पाळणा खेळणे, या गोष्टी शक्य होत नव्हत्या. त्यामुळे रिकाम्या खिशाने दिवसभर यात्रेत फिरायचे. डोळ्यांनी मन भरून यात्रेतील प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहायची. आठ दिवसात यात्रेतील प्रत्येक दुकान, प्रत्येक गोष्ट रोज मी बघायचो. यात्रा म्हणजे दिवसभर फिरायचे, घरी येऊन जेऊन झोपायचे. हा नित्यक्रम खुप आनंद देत होता. पण त्या वेळचा आनंद आज कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नव्हता. बालपण ते बालपणच असते. विनायक बालपणाच्या आठवणीत हरवून गेला होता. दुर्गा हळूच म्हणते, ‘‘ अहो….! ऐकलत का, मी केव्हापासून तुम्हाला आवाज देते. ’’ तुमचे लक्ष कुठे आहे. आपल्याला देव घरात ठेवण्यासाठी एक छान समई घेऊ का? बघाना किती छान पितळी समया आहेत. विनायक गालातल्या गालात हसून म्हणतो, ‘‘ अग….! तुला आवडली असेल तर घे ’’ दुर्गा ने एक छान पितळी समई विकत घेतली. पुढे यात्रेत फिरत फिरत खेळण्याच्या दुकानाची लाईन सुरु झाली. वैभव नाचत उड्या मारू लागला. बापरे….! केवढी मोठी मोठी खेळणी….! अरे….! वा….! रिमोट वरची गाडी पण आहे. बाबा….! चला लवकर मला खेळणी घेऊन द्या. मी रिमोटची गाडी घेणार. विनायक वैभवला घेऊन एका खेळण्याच्या दुकानात थांबतो. अरे….! अगोदर दुरूनच खेळणी बघून घे, तुला नेमकी जी खेळणी आवडली असेल तीच घेऊया. दुकानात सगळीच खेळणी छान आहे. मग काय सगळे दुकान घ्यायचे का? तू सांग….! वैभव कधी रिमोट गाडीला हात लावायचा. तर कधी हवेचा मोठा चेंडू, तर कधी हवेत उडणारे विमान, तर कधी वाजणारे डमरू, एकदम ऐवढी खेळणी बघून त्याला काय घ्यावे काहीच सुचत नव्हते. शेवटी खूप वेळाने त्या दुकानात रिमोटची गाडी घेतली. पुढे  चालता चालता वैभव पुन्हा म्हणतो, ‘‘ बाबा तुम्ही मला एक खेळणी घेऊन दिली, आता आई मला एक खेळणी घेऊन देईल ’’ मी आई कडून परत एक खेळणी घेणार म्हणजे घेणारच….! बरं.…! तुझ्या आईकडून पण एक खेळणी घे. पण परत काही घ्यायचे म्हणू नको. खूप सारी खेळणी एकदाच घेऊन तू एकावेळी खेळू शकतील का? नाही ना.…! मग कशाला खूप खेळणी….! असे म्हणून विनायक वैभवला घेऊन परत एका खेळण्यांच्या दुकानात जातो. तिथे खेळणी पहात असताना एक स्त्री विनायक कडे बघत.…! बघत….! अरे विनायक कसा आहेस. ओळखले का? विनायक एकदम त्या स्त्री कडे बघून विचारात पडतो. अरे….! मी प्रिया….! माने गुरुजींची मुलगी. हो….! हो….! प्रिया आता ओळखले. अग….! किती दिवसानंतर आपण भेटतोय. कसे ओळखणार….! लहानपणी आपण शाळेत होतो. सातवी नंतर तुझी माझी भेटच नाही. अरे हो….! माझ्या बाबांची बदली झाली. त्यानंतर आम्ही रामपूर सोडून गेलो. त्यानंतर माझे पुढचे शिक्षण ही तिकडेच झाले. त्यानंतर बाबांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पुण्याला राहायला गेले. त्या सगळ्या घाईत रामपूरला येण्याचा कधी योग आलाच नाही. हे माझे मिस्टर सुशांत….! पुण्यात अभियंता आहेत. नमस्कार साहेब….! मी विनायक पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीला आहे. ही माझी बायको दुर्गा….! व हा माझा मुलगा वैभव….! प्रिया व मी पहिली ते सातवी एकाच वर्गात शिकलो. ती आमच्याच गल्लीत राहत होती. आम्ही लहानपणी चांगले मित्र होतो. पुढे तिच्या वडिलांच्या बदलीमुळे ते रामपूर सोडून गेले. त्यानंतर कधी भेट झालीच नाही. त्यानंतर यात्रेमुळे आज भेटण्याचा योग आला. विनायक हळुच विचारतो. काका काकू कसे आहेत. छान….! आहेत. माझे बाबा आता निवृत्त झाले. त्यामुळे आई बाबा दोघेही आमच्या मूळ गावी राहतात. प्रिया म्हणाली, ‘‘ तुझे आई बाबा कसे आहेत. ’’ ते पण छान आहेत. माझी छोटी बहिण मुंबईला राहते. तिला छोटे बाळ आहे. त्यामुळे आई-बाबा गेल्या काही दिवसापासून तिच्याकडेच गेलेले आहे. ताईचे बाळ छोटे आहे ना….! त्यामुळे आई-बाबा यात्रेला सुद्धा नाही आले यावर्षी. हो….! का….! त्यांना सांगशील प्रिया भेटली होती. तुमच्याबद्दल विचारत होती. हो….!  हो….! नक्की सांगतो. मला शिक्षणानंतर पोस्टात नोकरी मिळाली. योगायोगाने माझी गावाजवळच बदली झाली. त्यामुळे मी रामपूरलाच राहतो. हो….!  का….!  अरे वा छान….! झाले. वहिनीला घेऊन ये….! पुण्याला एकदा….! माझ्याकडे, दोन चार दिवस राहा. गप्पा-टप्पा होईल पुण्यात फिरता येईल. बघू….! कधी तरी….! योग आला की, येईल नक्की. विनायक मान हलवुन प्रियाला होकार देत होता. प्रिया जाताना ये घरी साहेबांना घेऊन. वाटल्यास थांबून जा आजच्या दिवस.…! उद्या परत यात्रेत फिरता येईल. अरे….! विनायक थांबता नाही येणार. आम्ही आजच रात्री पुण्याला वापस निघतोय. यांना सुट्टी नाही त्यामुळे जावेच लागेल. पण येतांना चहा घ्यायला नक्की येतो घरी. असे म्हणून प्रिया व तिचे पती तिथून निघून जातात.

                             विनायक दुर्गाला सांगतो. अग….! प्रियाचे बाबा आपल्या रामपूरच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे ते येथेच राहत होते. आपल्या घराच्या बाजूलाच दोन घरं सोडून ते तिथे किरायाने राहत होते. प्रिया लहानपणी तिच्या आई सोबत आपल्या घरी नेहमी येत असे. आम्ही लहानपणी एकत्रच खेळायचो. लहानपणी आमची खुप खुप गट्टी जमायची. आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण पुढे बदलीमुळे ते रामपूर सोडून गेले. यामुळे प्रियाला व गुरुजींना भेटण्याचा योग आला नाही. पण तुझ्या एक लक्षात आले का….! तिच्या बाबाने तीला या यात्रेच्या निमित्ताने खंडोबाच्‍या दर्शनाला पाठवले. गुरुजी नियमित मंदिरात जायचे ते खंडोबाचे खूप भक्त होते. गुरुजी आमच्या शाळेची कधी कधी सहल मंदिरात घेऊन जात असे. आम्ही सर्व मुलं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरच्या मोकळ्या पटांगणात बसायचो. गुरुजी आम्हाला देवाच्या विषयी माहिती सांगायचे. प्रियाचे वडील अतिशय शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे होते. आम्ही त्यांना खूप घाबरायचो. मुले गल्लीत खेळत असले व समोरून गुरुजी आले की, सगळी मुले एका क्षणात गायब होऊन जायचे. ऐवढी आदरयुक्त गुरुजीची भीती होती सर्वांना त्यामुळेच तर रामपुरची अनेक मुलं घडली. मला पण गुरुजीच्या शिकवणीमुळे नोकरी मिळाली. आता एक दिवस नक्कीच….! प्रियाच्या मूळ गावी जाऊन गुरुजीची भेट घेऊ या….! त्यांनाही खूप आनंद होईल. आपल्या रामपूर बद्दल गुरुजी कुतूहलाने सारी विचारपूस करतील. गप्पा मारत मारत यात्रा फिरून झाली. वैभवला खेळणी घेतली. दुर्गाला घरात लागणाऱ्या काही वस्तू घेतल्या. आज दिवसभर यात्रेत फिरून कंटाळा आला होता. भूक पण लागली होती. आम्ही एका मिठाईच्या दुकानात जाऊन गरम गरम जिलेबी खाल्ली. तिखट चिवडा व जिलेबीचा पोटभर अस्वाद घेतला. यात्रेतील जिलेबी व चिवडा म्हणजे फेमस पदार्थ होय. यात्रेतील जिलेबीची चव वर्षात एकदा चाखायला मिळते. वैभवसाठी घरी जाताना भरपूर खोबऱ्याचा प्रसाद घेतला. आम्ही घरी निघालो. दुर्गा मध्येच म्हणाली, ‘‘ अहो तुमच्यासाठी काहीच घेतले नाही यात्रेत आपण ’’ मी हसत म्हणालो, ‘‘  मी वैभव सारखा छोटा आहे का….! खेळणी वगैरे घ्यायला. ’’ अहो….!  असे नाही. पण काही महत्त्वाची एखादी अशी वस्तू घेतली असती बघा….! माझ्याच डोक्यात आले नाही. अग….! मी तुमच्या चेहर्‍यावरचा मन भरून आनंद घेतला. मला यातच समाधान वाटले. यात्रेत अनेक मित्र भेटले, प्रिया भेटली, या माणसांना भेटण्याचा आनंद मला बालपणीची यात्रा करून गेला. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. घरी येताच वैभवने रिमोटच्या गाडीत सेल टाकून गाडी खेळणे सुरू केले. गाडी खेळता-खेळता वैभव म्हणतो, ‘‘ बाबा यात्रा संपण्याच्या अगोदर पुन्हा एकदा जाऊ या, यात्रेत मजा करायला. ’’ बघूया वेळ मिळाला तर नक्की जाऊ. असे म्हणून मी अंग टाकले. दुर्गा पाण्याचा ग्लास घेऊन आली. मी पाणी पित दुर्गाला सांगु लागलो. माणसाच्या जीवनात पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा खूप वाढते. पण समूहातील आनंद हा या सगळ्यापेक्षा अधिक समाधान देऊन जातो. माणसाचे आयुष्य हे यात्रे सारखेच भरगच्च सजलेले व सर्वांना आनंद वाटणारे असावे.


Friday, 25 September 2020

संस्काराचे मोती

                       संस्काराचे मोती

निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे कोकण होय. सौंदर्याने नटलेल्या या कोकणात काजू, फणस व आंब्याच्या बागांनी अधिकच भर घातली आहे. या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे स्वर्गसुख प्राप्त झाल्यासारखे वाटते. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणातील मजा काही वेगळीच होती. राधिका मावशीचा जन्म याच कोकणातील मालवणचा होता. लग्नानंतर मात्र राधिका मावशींना चिपळूणला जावे लागले. सासरही कोकणातीलच मिळाले म्हणून राधिका मावशी खूप खुश होत्या. “ माहेर व सासर कोकणात मिळायला फार भाग्य लागते. ” असं त्या नेहमी म्हणायच्या. लग्नानंतर एका वर्षांनी राधिका मावशींना सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. आई व बाबा मुलीच्या जन्मामुळे खूपच खूश होते. कारण राधिका मावशीच्या सासरी तीन पिढ्यापासुन  मुलगी नव्हती. मुलीच्या जन्माने तीन पिढ्यांची उणीव भरून काढली होती. थाटामाटात मुलीचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. राधिका मावशीच्या सासरकडील सर्व बायका, सासू-सासरे, नवरा, दिर असे सर्वजण मालवणला आले होते. राधिका मावशीच्या सासूने मुलीच्या कानात कुर्र....! आवाज करून कुसुम नाव ठेवले. सर्वांना आवडती कुसुम आता चार महिन्याची झाली होती. कुसुमला आता स्वतःच्या घरी नेण्यासाठी तिचे बाबा मालवणला आले होते. राधिका मावशीची भरल्या ओटीने सगळ्यांनी पाठवणी केली. कुसुम आता बाबांच्या मांडीवर जाऊन बसली होती. आजोबा लाडात कुसुमला म्हणतात. लबाड कुठली....! बाबा आले तर....! घरी जाण्यासाठी तयार झाली. आज तुझे रडने गायब झाले. खूप रडून घेतले कुसुम बाई....! आमच्या मालवणी काय तुम्हाला करमत नव्हते का....! आजोबाच्या लाडाने नात खळखळून हसली. सर्वांनाही खळखळून हसू आले....! राधिका मावशी, कुसुम, व तिचे बाबा यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. एसटी बस निघाली. कुसुमने आजोळ सोडले. 

             स्वतःच्या गावी चिपळूणला जायला निघालेल्या या चिमुकलीला नियतीचा खेळ कुठे माहित होता....! जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या भाग्यरेषा बदलता येत नाही. देवाने लिहून पाठवलेल्या भाग्यरेषा भोगाव्याच लागतात. मात्र त्या भाग्यरेषा माणसाला वाचता आल्या असत्या तर....! स्वतःचे भाग्य अनेकांनी बदवले असते. मालवण वरून चिपळूण सहा तासाचा रस्ता होता. गाडी जशी जोरात धावू लागली, तसा खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. थंडगार हवेमुळे कुसुमला छान झोप लागली होती. मालवण वरून गाडी निघून चार तास झाले होते. आता दोन तासात चिपळूण येईल....! राधिका आपल्या घरी सगळे कुसुमला भेटायला आतुर झाले आहे. नाव ठेवायला आले होते त्यानंतर पुन्हा कुसुमला पाहण्याचा योग आला नाही. कुसुमचे बाबा व राधिका मावशी बस मध्ये गप्पा मारत होते. बस भरधाव धावत होती. अचानक बसला बिघाड झाली. ड्रायव्हरचे बस वरील नियंत्रण सुटले व बसचा मोठा अपघात झाला. बसचा अपघात एवढा भीषण होता की, बस मधील जवळजवळ पंचवीस लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. या अपघाताने मात्र कुसुमच्या डोक्यावरचे छत्र हरवले होते. राधिका मावशी व तिचे पती दोघांचे या अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात मात्र नशिबाने भाग्यवान असणारी कुसुम मात्र सुखरूप बचावली होती. या अपघाताच्या बातमीने मालवण व चिपळूणची सर्व माणसं हादरून गेले होते. नियतीच्या या क्रुर डावापुढे कोणाचेच काही चालत नाही. राधिका मावशी व कुसुमच्या बाबाच्या निधनाच्या बातमीने सर्व नातेवाईक फार हादरून गेले होते. दुःखाच्या अथांग सागरात कुसुमच्या नशिबाची नाव डुबली होती. चार महिन्यापूर्वी, काही तासांपूर्वी नशीबवान, भाग्यवान असणारी कुसुम मात्र नियतीपुढे हरली होती. या अपघाताविषयी सर्व कोकणात हळहळ व्यक्त झाली. कुसुम मात्र सगळ्यांच्या तोंडी नशीबवान ठरली होती. या भीषण अपघातातून देवाने कुसुमला सुखरूप बचावले होते. हा चमत्कार कसं काय घडला....! ते कुणालाच कळत नव्हते....! आई व बाबाच्या निधनाने पोरकी झालेली कुसुम मालवणी परतली होती.

                    कुसुमचा  सांभाळ आता मामा-मामी करू लागले होते. कुसुम ही राधिका मावशीची आता शेवटची आठवण होती. आजोळी कुसुम राधिका मावशीची उणीव भरून काढत होती. काळजाचा तुकडा गेल्यामुळे आजी-आजोबांना फार धक्का बसला होता. पण कुसुमकडे बघून थोडे फार दुःख हलके होत होते. आजी-आजोबा, मामा-मामीच्या लाडात कुसुम मोठी होत होती. राधिका मावशीच्या स्वप्नांना आता कुसुमच्या रूपाने पूर्ण करावे लागणार होते. ही जबाबदारी ओळखून कुसुमच्या मामाने कुसुमला छान संस्कार दिले होते. घरातील सर्वांच्या लाडात कुसुम अनेक नवीन नवीन गोष्टी शिकत होती. आजी आजोबांनी तिच्या बालमनावर खूप चांगले संस्कार केले होते. बोलणे, चालणे, वागणे, अशा सर्व गोष्टीत कुसुम सुसंस्कारित झाली होती. कुसुमला बघता बघता सहा वर्षे पूर्ण झाले होते. या वर्षी शाळेत टाकावे लागणार म्हणून कुसुमच्या आजोबांनी गुरुजीशी तसे बोलून पण ठेवले होते. पावसाळा सुरू झाला होता. धो....! धो....! पडणाऱ्या पावसा बरोबरच लहान मुलांना आनंद देणारी शाळाही सुरू झाली होती. कुसुमच्या आजोबांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाऊन कुसुमचे नाव गुरुजीकडे नोंदवुन दिले. गुरुजींनी कुसुमला नाव विचारून बोलते केले. खूपच गोड मुलगी आहे कुसुम....! हरणे काका अगदी तुमच्यावर गेली नात....! असे म्हणून,  “ गुरुजींनी कुसुमचे तोंड भरून कौतुक केले.’’  खूप हुशार आहे मुलगी....! एक दिवस नाव मोठे करेल तुमचे....! नातीच्या हुशारीने आजोबांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी का होईना....! पण थोडा आनंद झळकला होता. शाळेत नाव दाखल होताच कुसुमला गुरुजींनी नवीन पुस्तके, पाटी व लेखणी दिली. कुसूम खूप आनंदी झाली होती. आता नियमीत कुसुमची शाळा सुरू झाली. दिवसभर शाळेत नवनवीन गोष्टी शिकायच्या, घरी आले की आजोबांना ते सांगायचे. शाळेत गुरुजी, घरी आजोबा या दोघांच्या शिकवणीने कुसुम लवकरच लिहायला व वाचायला शिकली होती. गणितातही सर्व क्रिया करू लागली. शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान पक्के झाले होते. घरातील कोणीही कोणतेही काम सांगितले की, कुसुम पळत-पळत काम पूर्ण करायची. स्वतःतील नम्रपणा, बोलण्यातील गोडवा, अभ्यासातील हुशारी यामुळे कुसुम घरीदारी सर्वांची लाडकी कौतुकास पात्र ठरत असे. आईवडिलांची उणीव आतापर्यंत कुसुमला घरच्यांनी भासू दिली नाही. आई वडीला वाचून पोरकी असल्यामुळे तिचे फक्त लाड होत असे. तिच्यावर कधीच कुणी रागवत नसे. कुसुम सुध्दा तशी वेळ कधी येऊच देत नव्हती. बघता बघता कुसुम चौथी पास झाली. वर्गातून प्रथम आली व शिष्यवृत्तीची परीक्षाही पात्र झाली. म्हणून गुरुजींनी हरणे काकांच्या घरी भेट देऊन कुसुमचे कौतुक केले. गुरुजी घरी येऊन कुसुमचे कौतुक करतात. यामुळे कुसुमचा सर्वांना अभिमान वाटला. आजी आजोबा, मामा मामीच्या संस्काराने व शाळेतील गुरुजीच्या शिक्षणाने कुसुम परिपूर्ण होत होती.

               बघता बघता कुसुम एस.एस.सी, एच.एस.सी मध्ये प्रथम आली. कुसुमने आपल्या पहिल्या नंबरची परंपरा कायम ठेवली होती. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली. शिक्षण, संस्कार, समजुतदार पणा याबरोबरच सौंदर्यानेही ती अधीक बहरली होती. तारुण्यातील नवचैतन्य तिच्या चेहर्‍यावर झळकत होते. पण मुळात संस्कारी असलेली कुसुम आपल्या वयाने व सौंदर्याने भाळून न जाता या वयातही स्वतःची पायरी ओळखून वागत असे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने खूप यश मिळवले होते. पण आयुष्यात खुप काही गमावले सुद्धा होते. जन्मानंतर चार महिन्यात आईवडील गमावले होते. त्यांचा चेहरा ही तिला आठवत नव्हता. पुढे दहावीत असतांना ज्यांनी आई-वडीला प्रमाणे सांभाळले ते आजी-आजोबाही एका पाठोपाठ तिला कायमचे सोडून गेले. ती इतरांसाठी नशीबवान वाटत होती. पण स्वतःसाठी मात्र कम नशिबी होती. आता आजी आजोबांच्या पश्च्यात कुसुमची जबाबदारी मामा व मामीवर पडली. मामांनी कुसुमच्या पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व कुसुमच्या लग्नासाठी एखादा चांगला मुलगा शोधणे सुरू केले. आई-वडील व बहिणीच्या मनाला शांती लाभावी असे कुसुम चे थाटामाटात लग्न करण्याचे मामाने मनाशी पक्के केले होते. स्थळ शोधण्याची मोहीम सुरू झाली अनेक ठिकाणी मामा जाऊन आले. पण त्यांना योग्य असे स्थळ मिळत नव्हते. एके दिवशी कुसुमच्या मामीच्या नातलगातील एका स्थळाचा निरोप आला. मामांनी लगेच दोन चार दिवसात येतो म्हणून निरोप दिला. मामा व त्यांचा सोबती दोघेजण मुलगा बघून आले. मामांना मुलगा खूप आवडला होता. त्यादिवशी मामांनी कुसुमला जवळ बोलावून घेतले. मामा कुसुमला मुलाविषयी सांगू लागले. बघ कुसुम मुलगा कोकणातीलच आहे. खेड जवळच त्याचे छोटेसे गाव आहे. गावावर शेती आहे त्यांचा तिथे मोठा वाडा आहे. काजूच्या व आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत. मुलगा पुण्याला शिकत होता तो आता इंजिनियर होऊन मुंबईला मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. मुलगा दिसायलाही खूप सुंदर आहे. त्याचे आई-वडील गावाकडेच राहतात. त्यांना मात्र मुलगी शिकलेली व दिसायलाही सुंदर पाहिजे. लग्नानंतर मुलगा मुलीला मुंबईला सोबत नेणार आहे. त्यामुळे मुलगी शिक्षणा बरोबरच संस्कारित व शहरात अॅडजेस होणारी पाहिजे. त्यांना मी तुझ्याविषयी सर्व खरी खरी माहिती सांगितली. त्यांना स्पष्ट सांगून आलो मुलगी बघतांना तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. आमची कुसुम लाखात एक आहे. जसा शिंपल्यातील मोती चमकावा तशी ती सर्व ठिकाणी स्वतःच्या संस्कारांनी चमकत असते. ‘‘ माझ्या राधिकाताईच्या काळजाचा तुकडा आहे तो.....! ” तुम्हाला नक्कीच आवडेल....! दोन दिवसांनी बघायला येणार आहे असा निरोप पाठवला त्यांनी....! आजच निरोप मिळाला. कुसुम हे ऐकतच मामाच्या समोर बसून होती. तिचे डोळे एकदम भरून आले. लहानपणी आई वडील गेले. निट आईचा चेहरा तिला आठवत नाही. पण आई-वडिलांच्या आठवणीने मात्र ती कधीकधी खूप अस्वस्थ होत असे. मामाने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले. वेडी आहेस का तु....? असे रडायला काय झाले. मुलगा नुसता बघायला येतोय....! उद्याच काही घेऊन जाणार नाही. आणि हो....! तसंही मुंबईमध्ये राहायला नशीब लागतंय....! मुंबई काही साध्यासुध्या लोकांचे शहर नाही. येथे राहायला पैसा व ज्ञान दोन्ही लागते. मध्येच मामी म्हणाली, “ आपली कुसुम काय अशिक्षित आहे का? ” ती एवढी शिकली, संस्काराने या कुटुंबात वाढली, कुणाला अशी सुसंस्कारित मुलगी आवडणार नाही. आमच्या कुसुम बाईंना आधी मुलगा तर बघू द्या....! त्यांना आवडला....? तरच पुढचे पुढे बघू....! मुंबईत माणसंच राहतात. यंत्राची पुतळे नाही. कुसुम व मामा दोघेही मोठ्याने हसतात. मामा कुसुमकडे बघून म्हणतात, “ तुझी मामी म्हणजे आपल्या घरची बॉस...! ” ती आपल्या दोघांना बोलण्यात ऐकणार नाही.

                पाहुणे येणार म्हणुन मामाने घराची साफसफाई करून घेतली. घरासमोरील बाग, अंगणातील केरकचरा वेचुन घेतला. आजी आजोबा गेल्यापासून घराला घरपण राहिले नव्हते. जणु घरातील नवचैतन्य हरवले होते. आज कितीतरी दिवसांनी संपूर्ण घराची स्वच्छता झाली. आज पाहुणे येणार म्हणून कुसुमने सकाळीच तयारी केली. खेड वरुन पाहुणे आले, त्यांनी कुसुमला बघितले. तिला अनेक प्रश्न विचारले जवळ जवळ एक तास कुसुमची परीक्षा घेतली. कुसुमने मात्र त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाने जाताजाता कुसुम पसंत असल्याचे सांगून टाकले. पुढील बोलणी तुम्ही माझ्या आई बाबा सोबत करून घ्या. लग्नाचा काय मानपान असेल तो ठरवून घ्या. असे अजयराव  यांनी सांगितले. मामांनी व अजयच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी करून लग्नाचा मुहूर्त ठरवला. ठरलेल्या मुहूर्तावर कुसुम व अजयचे थाटामाटात लग्न पार पडले. कुसुम जन्म झाल्यापासून एक दिवस वाडा सोडून गेली होती. त्यानंतर परत ती कधी या वाड्याला सोडून गेली नाही. आज मात्र अजय सोबत कायमची हा वाडा सोडून सासरी निघाली होती. मामांना कुसुमच्या बालपणाची आठवण झाली. मामा मोठ्याने रडू लागले. कुसुमला पोटच्या गोळ्याप्रमाणे जिवापाड जपले होते. कुसुमच्या वीस वर्षाच्या आयुष्यात कधीही कुसुमला रागवायचे काम पडले नाही. एवढी गुणी व सर्वगुणसंपन्न  माझ्या आयुष्यातील मोती मी आज तुम्हाला देत आहे. तिला जीवापाड जपा असे अजय रावांना सांगून मामा पुन्हा रडायला लागले. सर्वांनी जड अंतकरणाने कुसुमला वाटे लावले. सासरी आल्यावर सर्वांशी ओळख झाली. लग्नाचा मानपान सोहळा पार पडला. यात जवळजवळ पंधरा दिवस लोटले होते. अजयच्या  सुट्ट्या संपल्या होत्या, त्यामुळे अजय व कुसुम मुंबईला निघून आले. कुसुमने स्वतःचा संसार थाटामाटात उभारला होता. कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्मलेली ही मुलगी, आई बापा वाचून मामाकडे राहिली. शिक्षण, व संस्काराने नटुन मोठी झाली. आज एवढ्या मोठ्या मुंबई शहरात वास्तवास आली होती. लहान पणापासून हुशार, प्रामाणिक, सुसंस्कारित असल्यामुळे ती मुंबईला सहज रमून गेली. अजय व कुसुम यांचे विचार खूप जुळत होते. कुसुम कोकणातील एका खेड्यातील असूनही विचारांनी व ज्ञानाने पुढारलेली आहे. ती नेहमी आपल्याला प्रत्येक कामात भक्कम साथ देते. नेहमी चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करते. या सर्व गोष्टीमुळे अजयला तिचा खूप अभिमान वाटत होता. हसत खेळत संसाराची सहा महिने कधी निघुन गेले हे दोघांनाही कळले नाही. अजय काम करत असलेल्या कंपनीला खूप मोठा नफा झाल्यामुळे कंपनीच्या मालकाने  मुंबईतील एका मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. यासाठी कंपनीतील मोठ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकुटुंब पार्टीचे निमंत्रण दिले होते. अजय सुद्धा या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. त्यामुळे सहकुटुंब पार्टीचे निमंत्रण मिळाले. अजय त्यादिवशी कंपनीतून घरी आल्या आल्या त्यांने ही आनंदाची बातमी कुसुमला सांगितली. तिलाही खूप आनंद झाला. खूप दिवसांनी दोघांना कुठेतरी बाहेर एन्जॉय करता येणार होता. माझा नवरा कंपनीत प्रामाणिक व धडपडीने काम करतो. कंपनीच्या नफ्यात माझ्या नवऱ्याचा वाटा आहेच की....! याशिवाय थोडीच हे निमंत्रण मिळाले....! मी नटून थटून माझ्या नवऱ्या सोबत पार्टीला जाणार आहे. कुसुम आज मोठ्या थाटात बोलत होती. कुसुमबाई साहेब नक्की या....! तुम्ही आम्हाला रोज रोज आनंदाने कंपनीत पाठवता ना....! त्यामुळेच तर कंपनीच्या मालकांनी तुला सुद्धा निमंत्रण दिले. कुसुम चिडुन बोलली. बस आता....!  पुरे झाले कौतुक....! हात धुऊन लवकर तयार व्हा. मी जेवायला ताट वाढते.

            शेवटी कंपनीच्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आज कंपनीला सुट्टी होती सर्व कर्मचाऱ्यांना सायंकाळी पार्टीच्या ठिकाणी येण्याचे निमंत्रण होते. त्यामुळे अजयराव आज खूप वेळ झोपून होते. रोज मात्र सकाळीच उठून तयारी करावी लागत असे. वेळेचे सेकंदा सेकंदाला महत्त्व आहे या मुंबईत....! आमच्या कोकणात तासन तास वाया गेला तरी कुणी टेन्शन घेत नाही. ही मुंबई म्हणजे लोकांचा श्वास आहे. इथे कोण झोपते व कोण उठते हे कळतच नाही. मुंबई मात्र चोवीस तास जागीच असते. सायंकाळी मी व अजय छान तयारी करून पार्टीसाठी निघालो. खूप दिवसांनी सायंकाळी नटून थटून आम्ही दोघे बाहेर पडलो होतो. झगमगत्या दुनियेत प्रत्येक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. येथे बाह्यरूपालाच जास्त किंमत आहे. शेवटी आम्ही दोघे जण कंपनीच्या पार्टी मध्ये पोहोचलो. खूप आलेशान महागड्या हॉटेल मध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी बसण्याची, जेवणाची, फोटो काढण्याची, नाचण्याची, गप्पागोष्टी करण्याची सर्व प्रकारच्या व्यवस्था येथे करण्यात आल्या होत्या. माझे व अजयरावांचे नवीन लग्न झालेले असल्यामुळे अनेक जण माझी ओळख विचारत होते. यांच्या कंपनीतील अनेक सहकारी मित्र लग्नाला आलेले नव्हते. त्यामुळे प्रत्येकाला मला बघण्याची उत्सुकता होती. अजय माझी सर्वांशी ओळख करून देत होते. आता पार्टीच्या हॉलमध्ये गर्दी जमली होती. जो तो आपापल्या ओळखीने मित्रांशी सहकुटुंब गप्पा मारत बसले होते. थोड्याच वेळात कंपनीचे मालक सर्वांना मार्गदर्शन करणार होते. अजय मला घेऊन त्याठिकाणी असलेल्या अनेक नविन गोष्टी दाखवत होता. अचानक माझ्या पायाला काही तरी टोचल्याचे मला भासले. मी खाली वाकून पायाला काय टोचले म्हणून बघितले तर माझ्या पायाजवळ गळ्यातील  एक हार पडलेला मला दिसला. मी तो उचलुन हातात घेतला. बघते तर अतिशय सुंदर नक्षी असलेला तो महागडा हार असावा....! कुणीतरी श्रीमंत बाईचा तो असेल.....! मी पटकन तो हार अजयजवळ दिला. अजयला कुतूहल वाटले येवढ्या घाईत जो तो एन्जॉय करण्यात व्यस्त आहे. तुला कसा काय? हा हार सापडला....! कुसुम एक मिनिट इथेच थांब....! मी हाराविषयी माईकवरुन जाहीर करतो. कुणाचा असला तर? त्यांना लगेच परत करता येईल. असे म्हणून अजय माईक जवळ गेला. माईक हातात घेऊन सगळ्यांना शांत राहण्याचा त्यानी इशारा केला. हॅलो फ्रेंड्स....! प्लिज एक मिनिट लक्ष द्या. एक महागडा लेडीज  हार माझ्या पत्नीला सापडला आहे. कुणाचा असेल तर प्लीज घेऊन जा. हॉलमधील सगळेजण आवाजाच्या दिशेने बघू लागले. तेवढ्यात तेथील एक नोकर पळतच आला. “ साहेब हा हार बाईसाहेबांचा आहे. ”  मी एकदम आश्चर्यचकित झालो. कुसुमला चक्क कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा हार सापडला होता. त्या मॅडमही आमच्या कंपनीत सीईओ म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी लगेच चौकशी करून मला व  कुसुमला स्टेजवर बोलावून घेतले. मॅडमच्या हातात माईक होता. आम्ही दोघेही स्टेजवर पोहोचलो. मॅडमनी सर्वांना हॅलो नमस्ते....! म्हणून इशारा केला. सगळा हॉल आता शांत झाला होता. मॅडम एकट्याच बोलत होत्या. लक्ष द्या...! आज माझा पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार दोन तासापूर्वी हरवला होता. कदाचित तो आता पुन्हा सापडणार नाही या चिंतेने मी अस्वस्थ होते. पण काय आश्चर्य आहे?...! तो आपल्या कंपनीच्या अजय साहेबांच्या पत्नीला सापडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हा हार परत केला. एवढे प्रामाणिक माणसं आपल्या कंपनीत काम करतात हे आमचे भाग्यच आहे. मी अजय व त्यांच्या पत्नीचे मनापासून स्वागत करते. हिऱ्याच्या हारापेक्षा सुसंस्कारीत मोत्यासारखी अजय व कुसुमच्या रूपाने संस्काराचे दोन मोती आज मिळाले. त्याचा अधिक आनंद मला झाला आहे. माणूस कुठे जन्माला आला याला महत्त्व नाही. शहर, गाव यापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत. कुसुम सारखा संस्काराचा मोती प्रत्येक घरात जन्माला  यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा दोघांचे अभिनंदन करते व त्यांना धन्यवाद देते. आज कुसुममुळे पुन्हा एकदा माझी मान उंचावली होती.  ती तिच्या अंगी असलेल्या ‘ संस्काराने ’….! याचा मला खूप आनंद झाला. 

✍✍✍✍✍

लेखक

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852



Tuesday, 22 September 2020

पाऊलवाट

               पाऊलवाट (लघुकथा) 

दिवस मावळतीला आला होता. अंगणातील वडाच्या झाडावर नेहमी प्रमाणे पक्षांनी जमायला सुरुवात केली होती. सर्व पक्षी वडाच्या झाडावर आले की, त्यांची किलबिलाट सुरू होत असे. हे पक्षी जणू आमच्या घरातील सदस्य झाले होते. मी घरातून ओंजळभर दाणे आणून अंगणात टाकले. तसे हळूहळू वडाच्या झाडा वरील पक्षांनी अंगणात दाणे टिपायला सुरुवात केली. मोहनच्या बाबांची वाट पहात मी दरवाजातच उभी होते. मोहनचे बाबा तालुक्याच्या गावाला एका शेठजिकडे कामाला होते. ते रोज सकाळी कामावर जात असे व सायंकाळी मिळेल त्या वाहनाने घरी येत असे. आज त्यांना कामावरून यायला जास्तच वेळ झाला होता. एरव्ही दिवस मावळायच्या दोन तास आधी ते घरी येत असत. आज मात्र दिवस मावळायला आला तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. मी बराच वेळ त्यांची वाट पहात दरवाजातच उभी राहिले. अंधार पडू लागला तशी माझी चिंता मात्र अधिकच वाढू लागली. मी निराश होऊन स्वयंपाक घरात आले व स्वयंपाक करत बसले. आधीच त्यांना यायला उशीर त्यात स्वयंपाक उशिरा म्हटल्यावर ते परत रागावतील. मी पटपट स्वयंपाक करू लागले. मी हळूच मोहनला आवाज दिला. मोहन बाहेर अंगणात लक्ष ठेव तुझे बाबा येतीलच येवढ्यात. तुझा अभ्यास करत बस. दिवसभर शाळेत काय शिकवले ते पहा जरा. शाळेतून आल्यापासून नुसता खेळत असतो. जरा अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या बाबा सारखे तुलाही रोजच तालुक्याला कामाला जावे लागेल. मोहन चिडचिड करतच अभ्यासाला बसला. इतरवेळी घरात मोहन व त्याचे बाबा खूप मस्ती करत बसतात. मोहनला फक्त मस्ती करायला पाहिजे. अभ्यासाचा खूपच कंटाळा करतो. असे मी माझ्या मनाशीच बोलत होते. माझा स्वयंपाक आटोपला मी परत घराच्या दरवाज्यात येऊन उभी राहिले. आता मात्र सर्वत्र अंधार पडला होता. रात्र सुरू झाली होती. गावातील सर्व लाईट सुरु झाली होती. गाव विजेच्या लख्ख प्रकाशाने उठून दिसत होते. रात्र झाली तरी गल्लीतील मुले मात्र रस्त्यावर गोंधळ करत होती. मी घरात, दारात चकरा मारत होते. माझे कशातच लक्ष लागत नव्हते. मनात नाही....! नाही....! त्या शंका येत होत्या. आता बराच उशीर झाला होता. मी मोहनला जेवु घातले व त्याला झोपायला सांगितले. तो थोड्यावेळातच झोपी गेला. दारात येऊन पाहते तर गल्लीत काळं कुत्रंही जागं नव्हतं. सर्व गाव सामसूम निपचित पडलं होतं. गावातील लोकं जेवण करुन आपापल्या घरी शांत झोपी गेले होते. एरव्ही देवळात अर्ध्या रात्रीपर्यंत भजन चालत असते. आज मात्र देऊळही शांत शांत आहे. पूर्ण गावात जणू मीच एकटी जागी आहे. आज मी माझ्या मनाशी बोलत होते. मोहनचे बाबा अद्यापही आले नाही या चिंतेने मी फार अस्वस्थ झाले होते. आता मला फार भीती वाटू लागली होती. मी दरवाजा लावून घेतला व घरात एकटीच एका कोपर्‍यात रडत बसले. माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. मी एवढ्या रात्री मोहनला सोडून त्यांना बघायला सुद्धा जाऊ शकत नव्हते. मोहन बिचारा छोटा असल्यामुळे जेवून बाबांची वाट पाहत पाहत झोपी गेला. मला मात्र मोहनच्या बाबांची चिंता झोपू देत नव्हती. मी शेवटी थकून अंथरुणावर पडले. मला डोळा लागणार तेवढ्यात, दाराची कडी वाजली. टकटक....! टकटक....! असा दोनदा-तीनदा आवाज आला. मी पटकन उठले व दाराची कडी उघडण्यासाठी दारावर गेले. क्षणभर विचार केला नेमकी कोण असेल? एवढ्या रात्री मोहनचे बाबा नसले तर....! आपण घरात एकटेच आहोत. काय करावे? कसे करावे? या विचारात पडले. तेवढ्यात परत दरवाजाचा टकटक....! टकटक....! असा आवाज आला. मी कशीतरी हिंमत करुन हळूच विचारले. कोण आहे ? बाहेरून हळू आवाज आला. अग मीच आहे....! उघड लवकर....! मीच आहे म्हणाले, पण आवाज मात्र वेगळाच वाटतो. परत मी विचारले? मोहनचे बाबा का? हो....! हो....! मीच आहे गं....! उघड लवकर....! मी पटकन दरवाजाची कडी उघडली. एकदम मोहनच्या बाबाकडे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आकाशात वीज चमकावी तशी अनेक प्रश्नांची वीज माझ्या मेंदूत चमकली. मी प्रचंड घाबरले. मोहनचे बाबा रक्ताने भरले होते. डोक्यातून प्रचंड घळाघळा रक्त वाहत होते. अंगातील कपडे फाटले होते. संपूर्ण अंगाला वरखंडे लागले होते. पायात काहीच नव्हते ते अनवाणी पायी, रक्ताने माखलेल्या अवस्थेत माझ्या समोर उभे होते. त्यांना बघून माझ्या तोंडातून शब्दच फुटेना, घसा जणू कायमचा बंद झाला होता. मी थरथरत्या हाताने मोहन च्या बाबांना पकडले. काय झाले तुम्हाला....! हे .... कसं.... काय.... झाले. मी त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच प्रश्न विचारत बसले. त्यांना घरात घ्यायचे भानच मला उरले नव्हते. मी एकदम भानावर आले त्यांना पटकन घरात घेतले. दाराची आतून कडी लावली. त्यांना पटकन एक ग्लास पाणी आणून पाजले. घरातील सुती कपडे आणुन  त्यांचे डोके पुसले. सुती कपड्याचा काठ फाडून त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली. अंगातील फाटके, रक्ताने भरलेले कपडे बदलून घेतले. त्यांचे रक्ताने माखलेले अंग पुसले. त्यांना गरम चहा करून पाजला. मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. पण अवस्थाच अशी होती की, मी त्यांना यावेळी प्रश्न विचारून परत गोंधळात टाकू शकत नव्हते. त्यामुळे मी त्यांना एकही शब्द न बोलता गादीवर आराम करायला सांगितले. घरातील आंबी हळदीचा खडा उगाळून तो गरम पाण्यात शिजवून घेतला. हातापायावर, डोक्यावर, मार लागलेल्या ठिकाणी शिजलेली गरम अंबी हळद लावू लागले. त्यांची अवस्था पाहून एका डोळ्यात पाणी, तर एका डोळ्यात घरी सुखरूप आल्याचा आनंद झळकत होता. मी हळूच त्यांना म्हणाले आराम करा आता सकाळी बोलू. तुमची अवस्था बघवत नाही हो मला....! देवाने असे कसे केले तुमच्यासोबत....! असे बोलून मी स्वयंपाक घरात जाऊन ढसाढसा रडू लागले. पदराचा बोळा तोंडात दाबुन धरला तरी रडण्याचा हुंदका मला आवरेणासा झाला होता. आज माझ्या कपाळाच्या कुंकावरच घाव घातला होता. मोहनचे बाबा अतिशय शांत स्वभावाचे, कधी कुणाशी वैर नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, मनाने अगदी प्रामाणिक व कष्टाळू हा माणूस कधीच कुणाचे वाईट चिंतीत नाही. आज यांच्यासोबत काय झाले असेल?. माझे मन मात्र विचारांच्या काहूराने सुन्न झाले होते. रात्र खूप झाली होती. आज अन्नाचा घास आमच्या दोघांच्या पोटात गेला नाही. मी केलेला स्वयंपाक तसाच पडून होता. परमेश्वरा सकाळी सकाळी कुणाचे तोंड बघितले कुणास ठाऊक. आजचा हा वाईट दिवस आमच्या आयुष्यात कुणीकडुन आला. आम्ही परिस्थितीने गरीब होतो. पण कधीच कुणापुढे लाचार होऊन हात पसरत नव्हतो. मोहनच्या बाबांनी मला सुद्धा स्वाभिमानाने जगायला शिकविले होते. त्या दिवशी मला विचारा विचारात कधी झोप लागली कळलेच नाही.
                          सकाळी उठल्याबरोबर मी अंगणात झाडून शेणाचा सडा टाकला. दारात रांगोळी काढून घरात आले. मोहन व त्याचे बाबा अध्यापही  झोपूनच होते. एरव्ही सकाळी उठून कामावर जाण्यासाठी घाई करणारे मोहनचे बाबा आज मात्र शांत पडून होते. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हळूच आवाज दिला. अहो....! उठता का? ते मात्र निपचित पडून होते. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला असावा? त्यांना काहीच  सुचत नव्हते़. दिवस उगवुन खूप वेळ झाला होता. बाहेर कडक ऊन पडले होते. मी घरातील कामे आवरून परत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उठवले. माझ्या मदतीने ते कसेबसे उठले .चहा पाणी झाला ते मला घडलेला सर्व प्रकार सांगू लागले. लक्ष्मी मी आज कामावर गेल्यावर सकाळीच मालकांनी मागच्या महिन्याचा पगार देतो म्हणून सांगितले होते़. मालक मला म्हणाले, प्रसाद जाताना तुझा मागच्या महिन्याचा पगार घेऊन जा. मी त्यांना हो म्हणालो, व माझ्या कामाला लागलो. दुपारी मालक जवळ येऊन सांगु लागले. प्रसाद आज मात्र काम थोडे जास्त आहे. तुला थोडा वेळ होईल. हरकत नसेल तर....! एक तास शिल्लक थांबून तेवढे काम संपून जा. मी त्यांना मान हलवुन हो म्हणालो व माझ्या कामाला लागलो. दिवसभर रोजच्या प्रमाणे काम केले परंतु आज मालकाने सांगितलेले  शिल्लक काम केल्यामुळे मला उशीर झाला. मी मालकाला काम संपल्याचे सांगून निघालो. पण तेवढ्यात मालकांनी मला आवाज दिला. मागील महिन्याच्या पगाराचे पाकीट माझ्या हातात देऊन मालक म्हणाले प्रसाद पैसे संभाळून घेऊन जा. मी मान हलवून हो म्हणालो व  तिथून निघून आलो. रोजच्याप्रमाणे बस स्टँडवर आलो खरा, पण आपल्या गावी येणारी गाडी निघून गेली होती. मी थोड्या वेळ इकडे तिकडे विचारपूस केली पण कोणतेच वाहन काही मिळेना. उशीर झाल्यामुळे आपल्या गावातील सर्व वाहने गावी निघून आली होती. आपल्या गावाला यायला एक पाऊल रस्ता आहे. त्याने वेळही कमी लागतो व आंतरही कमी आहे. या रस्त्याने आपण घरी जाऊया असे मी ठरविले. परत गाडीची वेळ पहात बसलो तर अंधार जास्त होईल म्हणून मी त्या पाऊल रस्त्याने निघालो. आपल्या गावातील अनेक जण गाडी नाही मिळाली की याच पाऊलवाटेने तालुक्याला ये जा करत असतात. आम्हाला लहानपणी तालुक्याला यायला जायला हिच पाऊलवाट होती. रात्री मात्र अंधार पडल्यावर सहसा कोणी या पाऊलवाटेने येत नाही व जात नाही. कारण ही पाऊलवाट एकदम दाट झाडीतून व डोंगर रांगेतून जाते.त्यामुळे लोकांना चोरांची भीती वाटते. मी विचार केला आपल्यासोबत कुठे लेडीज आहे? लहान मुलही नाही. आपल्या एकट्याला कोण खाणार....! म्हणून मी लगबगीने पाऊलवाटेने घराकडे यायला निघालो. रस्त्याने थोडा अंधार पडला होता. पाऊलवाट असल्यामुळे कोणी येणार जाणार दिसत नव्हते. मी मात्र घरी येण्याच्या घाईने पटापट माझ्याच विचारात चालत होतो. तेवढ्यात अचानक माझ्यासमोर दोन-चार माणसं आली. त्यांनी मला अडवले. कोण कुठला? नाव गाव विचारले. मला वाटले नविनच वाटसरू असावे. त्यामुळे माहिती विचार असावे. त्यांनी मला थोडावेळ तिथेच गप्पा मारत उभे केले. आजूबाजूला कोणीच नव्हते अगदी सामसूम शांत वातावरण होते. ही माणसे कुठली? अचानक कुठून माझ्यासमोर आली. कशा साठी यांनी मला इथे थांबवले. हा विचार मी मनात करतच होतो. तोच एका व्यक्तिने माझ्या डोक्यात जोरात काठी मारली. मला खाली पाडले व माझ्या जवळ काही  पैसे , सोने, महत्वाच्या चीजवस्तू  आहेत का? ते तपासु लागले. मला एकदम मालकाने दिलेले पगाराचे पाकीट आठवले. आता आपल्या खिशातील पैसे जाणार म्हणून मी त्या माणसांशी खूप झटापट करु लागलो. मी त्यांना खिशातून पैसे घेऊच दिले नाही. त्यामुळे ती माणसे खूप चिडली व त्यांनी मला मारायला सुरुवात केली. त्यांनी मला लाथा, बुक्या, काठीने मारले. माझ्या खिशातील पैसे काढून घेतले व ती पळून गेली. मी मोठ मोठ्याने ओरडत होतो. वाचवा....! वाचवा....! कुणीतरी मला वाचवा.....! पण रात्रीची वेळ होती. पाऊलवाट सामसूम होती. कोणीही मला वाचवायला येणार नव्हते. मला डोक्यात काठी लागल्यामुळे बहुतेक चक्कर आली असावी. मी तिथेच खाली कोसळून पडलो. मला काय होत आहे हे समजलेच नाही. मी खूप वेळ तिथेच पडून होतो. थोड्यावेळाने डोकं थंड गार पडले. रक्ताने माझे डोके, तोंड, कपडे भरले होते. मला जाग आली तेव्हा मी, हळूच उठून पाहतो तर अंधारात मी एकटाच रस्त्यात पडून होतो. मी कसाबसा उठलो हळूहळू त्या पाउलवाटेने घराकडे निघालो. डोक्याला मार, हातापायांना मार, संपूर्ण अंग झोडपल्यावाणी झाले होते. माझ्या डोक्यातील रक्त गेल्यामुळे मला काही सुचत नव्हते. मी खूप थकल्यासारखा झालो होतो. मला खूप तहान लागली होती पण जवळपास अंधारात पाणी कुठेच मिळणार नव्हते. मी फक्त घरी येण्यासाठी एकेक पाऊल टाकत पुढे पुढे चालत होतो. मला मोहन व तुझी खुप आठवण येत होती. मोहनच्या बाबांना ही सर्व कहाणी सांगता सांगता खूप घाम आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव दिसत होते. मला तर ही सर्व हकिगत ऐकून चक्कर आल्यासारखे झाले. ते रात्रीचे चोर कसले....! दरोडेखोर म्हणा की....! त्यांनी तुम्हाला पैशासाठी मारले  व पैसेही घेऊन पळाले. दगडाच्या काळजाची माणसं कुठली....! पैशासाठी त्यांना माणसाचा जीव सुद्धा परका होतो. पैशासाठी माणसाच्या जीवावर उठणारी ही भूतच म्हणा की....! मोहनच्या बाबांच्या या अवस्थेतेमुळे मी रागाच्या भरात मोठ्या मोठ्याने बोलत होती. जाऊद्या पैशापेक्षा तुमचा जीव वाचला....! हे महत्त्वाचे आहे. पैसे काय कधीही कमावता येईल. तुम्ही  पटकन चला गावातील डॉक्टरला दाखवून गोळ्या औषध घेऊन येऊया. डोक्याला पण डॉक्टर पट्टी करून देईल. आता आठवडाभर कुठेच जायचे नाही. घरातच आराम करत बसा. तुमच्या त्या दीड शहाण्या मालकाला निरोप पाठवून सांगा. तुम्ही येणार नाही ते....! आणि हो....! घडलेली हकीगत होऊ द्या त्याला माहित. नाही तर त्याला वाटेल पगार मिळाला म्हणून घरीच मौजमजा करत बसले. त्यांनी एक तास जास्तीचे काम लावले नसते, तर हे सर्व घडलेच नसते. ‘‘ लक्ष्मी मालकावर  चिडून काय फायदा ’’ त्यांचा यात काय दोष आहे. त्यांनी आपल्याला जास्तीचे काम सांगितले तर मालक पगाराव्यतिरिक्त थोडे पैसे शिल्लक देतात. आणि हो....!  त्यांना माहित असते असे होणार आहे तर त्यांनी कशाला थांबवले असते. आपलेच नशीब खराब आहे. महीना भराची कमाई गेली वरून असा जीवघेणा हल्ला झाला. देवाची पुण्याई कामी आली बघ म्हणून मी वाचलो. नाहीतर त्या पाऊलवाटेवर मला सकाळ पर्यंत जाग आली नसती तर कदाचित मी कधीच घरी येऊ शकलो नसतो. तू नेहमी म्हणतेस ना....! देव आपल्याला काहीच मदत करत नाही. बघ....! आज देवाने तुझी हाक ऐकली....! माझ्या मदतीला देवच धावून आले बघ....! देवानेच मला त्या हल्ल्यातून वाचवले. मोहनचे बाबा माझी समजूत काढत होते. पण मला त्या मालकाचा रागच आला होता. गरिबीने आमच्या वाट्यावर हे दिवस आले होते. परिस्थिती माणसाला मजबूर बनवते. ते असे....! मी मनातल्या मनात पुटपुटत देवघराजवळ  गेले. देवाला हात जोडून  विनंती करू लागले. देवा माझ्या कुंकवाला असेच बळ दे....! माझ्या कुंकवाला नीट सांभाळ....! तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे....! तुझ्या कृपेने आज मोठ्या संकटातून मोहनचे बाबा वाचले. मी देवाला आरती लावुन ओवाळले. आरतीचे ताट घेऊन मोहनच्या बाबांना आरती दिली. यापुढे आता कधीच त्या पाऊलवाटेने येऊ नका. मी मोहनच्या बाबांना खडसावून सांगितले. हो....! गं....! लक्ष्मी मी यापुढे नाही येणार मोहनच्या बाबांचे हे शब्द ऐकुन मला जरा बरे वाटले.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852

Wednesday, 16 September 2020

झाडे लावा ; झाडे जगवा !

                        

             झाडे लावा ; झाडे जगवा ! 

      

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |

पक्षीही सुस्वरे आळविती ||

येणे सुख रुचे एकांताचा वास | 

नाही गुणदोष अंगी येत ||

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सजीवातील प्राणी व वनस्पती या दोन्हींचा एकमेकांशी असलेला संबंध व्यक्त केला आहे. वृक्ष हे सजीव आहेत. त्यांची वाढ होते. त्यांना अन्न, पाणी व हवेची गरज आहे. माणसापेक्षा वृक्ष अधिक चांगले व इमानदार आहे. त्यांचे जीवन परोपकारी आहे. माणूस मात्र स्वार्थी व क्षणिक सुखाच्या लोभाचे जीवन जगत असतो. एक छोटेशे रोपटे लावले, त्याची योग्य निगा राखली, त्याला खत पाणी घातले की, त्या झाडाची व्यवस्थीत वाढ होते. ते झाड मोठे झाल्यावर फुल, फळ, सावली देते. स्वतःचा मोठा विस्तार झाल्यावर सावलीच्या रुपाने अनेकांना आधार देते. गोड फळाच्या रूपाने प्रत्येकाच्या मुखात गोड स्वाद भरवते. पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्याचे काम झाडे करतात. प्रदूषण रोखणे, जमिनीची धूप, पाऊस पडणे अशा पर्यावरण विषयक समस्या सोडवण्यासाठी झाडांची महत्त्वाची भूमिका असते. आपण पाहतो समाजात एखाद्या व्यक्तीवर कितीही उपकार करा त्याला अडीअडचणीत मदत करा एक दिवस तो बदलेल सर्व उपकार विसरून जाईल. माणूसच माणसाला बेईमान होतो. परंतु एखादे लावलेले झाड आयुष्यात कधीच दगा देत नाही. ते त्याच्या परोपकाराचा गुणधर्म कधीच विसरत नाही. आयुष्यात जिवाभावाचे चार माणसे जोडता आली नाही. तरी चालतील, पण चार झाडं मात्र आयुष्यात लावले तर आयुष्याचा अनेक काळ त्याच्या सानिध्यात आनंदात घालता येईल. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, सरकार तर्फे 1जुलै ते 7 जुलै हा वन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सरकार दरवर्षी नवीन वृक्षलागवडीचा संकल्प करतात. सर्व जनतेला वृक्ष लागवडीसाठी आव्हान करतात. दरवर्षी लाखो, कोटींच्या संख्येत वृक्ष लावले जातात. वृक्षलागवडीचे फोटो, बातम्या पेपर मधून प्रकाशित होतात, पण वृक्षसंवर्धन, संगोपन होतांना दिसत नाही. वृक्ष लावण्याबरोबरच त्याचे संगोपन सुद्धा करणे गरजेचे आहे. झाडांची योग्य निगा राखली त्याला वेळोवेळी पाणी घातले तर वृक्ष मोठे होतील, बहरतील निसर्गाचे सौंदर्य वाढवतील. झांडाची संख्या लावण्या पुरती न राहता प्रत्यक्ष झाडे मोठी झाली पाहिजे. झाडे जगण्याची व वाढण्याची संख्या वाढली पाहिजे. मागील 20 वर्षांपूर्वी इंधन म्हणून लाकडाचा प्रचंड वापर होत होता. त्याच बरोबर घरातील विविध लाकडी वस्तू, लाकडी खेळणी, घर बांधकामासाठी लाकुड, अशा विविध कामासाठी वृक्षतोड व्हायची. आज मात्र घरातील लाकडी वस्तू कमी झाल्या, लाकडी खेळणी बंद झाली, घरांचे बांधकामे सिंमेट कॉग्रेटची झाली. इंधन म्हणून गॅस, रॉकेल, विद्युत शेंगडी आदी गोष्टींचा वापर अधिक वाढला. यामुळे वृक्षतोड फार कमी होऊ लागली होती. तरीही वृक्षांची संख्या मात्र कमी कमी होत गेली आहे. याचे कारण म्हणजे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यांनी जशी प्रगती केली. तशी पर्यावरणाची प्रगती मात्र झाली नाही. याउलट उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या, वसाहती, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, धरण, कालवे आदींमुळे प्रचंड वृक्षतोड झाली. आजही ही वृक्षतोड सुरूच आहे. कुठे तरी वृक्षतोडीला लगाम घातला गेला पाहिजे. नाहीतर एक वेळ पृथ्वीवरून वृक्ष नाहीसे होतील व संपूर्ण मानव जातीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मनुष्यजीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचला तर माणूस वाचेल निसर्ग व मानवजात हे एकमेकांचे मित्र आहेत. मानवच मानवाच्या जीवनात धोका निर्माण करत आहे. हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. आज आपण पाहतो समाजात मोठ मोठी लग्न समारंभ, वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यासाठी लाखो रुपयांचे फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. लाख रुपयांचा सत्कार खर्च मान सन्मानासाठी केला जातो. या ऐवजी हजार रुपयाच्या महत्त्वाच्या झाडांची रोपे आणून लग्नसमारंभातील प्रमुख अतिथी, नातेवाईक यांना देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना झाडे लावण्याचे आव्हान केले तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित व पर्यावरण पूरक समारंभ पूर्ण झाले असे म्हणता येईल. याच बरोबर वर वधूंना संसार रुपी जीवनाला सुरुवात करताना एक एक झाड लावण्याचे आव्हाहन केले पाहिजे. जर त्यांनी झाडे लावली तर त्यांचा संसार वृक्षाप्रमाणे निश्चितच अधिक फुलेल व आयुष्याचा काही काळ याच झांडाच्या सावलीत घालवता येईल. त्याचबरोबर घरातील, कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते. तेव्हा अंत्यसंस्कार, इतर विधी करुन आपण हळुहळु त्या व्यक्तिला विसरून जातो. त्या व्यक्तीच्या नावाने जर एक झाड लावले तर ती व्यक्ती झाडाच्या रुपाने सदैव आठवण म्हणून आपल्यासमोर असेल. झाडे लावणे व मोठी करणे काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा हा नारा खूप गाजला लोकांनी खूप झाडे लावली. परंतु झाडे जगवण्यात मात्र आपण कमी पडलो. मग त्याला कमी पाऊस, दुष्काळ, झांडाची निवड या सारखे कारणेही आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, प्रत्येकाने शेतात, रानात, जंगलात, मोकळ्या जागेत, घरा शेजारी, शाळेत, ऑफीसमध्ये एक तरी झाड लावावे. वर्षभर त्या झाडाची निगा राखावी. झाडे मोठी होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने लावलेले झाड स्वतःला व येणाऱ्यां पिढीला निश्चितच फायदा देत राहील. मानवाचे जीवन प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक होईल. झाडे शुद्ध ऑक्सीजन व निखळ आनंद देतात. ह्या दोन्हीची माणसाला गरज आहे. म्हणून 

‘‘ प्रत्येकाने झाडे लावूया झाडे जगवुया व झाडाप्रमाणे स्वतःचे आयुष्य आनंदाने सदैव बहरत ठेवूया. ’’

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


Saturday, 12 September 2020

प्राण्यांची सहल

प्राण्यांची सहल
एकदा जंगलाचा राजा सिंह याने सर्व प्राण्यांची मीटिंग घेण्याचे ठरवले. लगेच सिंहाने  ससोबा ला बोलावून घेतले. ससोबा ससोबा मी काय म्हणतो आपण सर्व प्राण्यांची सहल काढूया का ? ससोबा म्हणाला वा....!  काय छान आयडिया आहे. किती मज्जा येईल. सर्व प्राणी एकत्रित सहलीला सोबत असतांना खुप धमाल करता येईल. पण सर्व प्राण्यांना माहीत कसं होणार ? की आपल्याला सहलीला जायचं आहे. मध्येच ससा बोलला सिंह मोठ्या आवाजात ओरडून म्हणतो, ‘‘ अरे ससोबा मी त्यासाठीच तर तुला बोलावले ’’  तू पटकन जाऊन  सर्व प्राण्यांना सांग आज रात्रीला माझ्या गुहेमध्ये मी मिटींग घेणार आहे. त्यासाठी  तुम्हा सर्वांना बोलवलं आहे. बरं म्हणून ससोबा तिथून निघून गेला. ससोबा उड्या मारत मारत जंगलात फिरु लागला. लांडगा, कोल्हा, हरिण, हत्ती, वाघ, चित्ता, जिराफ, घोडा, अस्वल, माकड, या सर्वांना मीटिंगसाठी निमंत्रण दिले. रात्र झाली हळूहळू सर्व प्राणी राज्याच्या गुहेमध्ये जमा झाली. राजांनी हळूच सहलीचा विषय काढला. मी काय म्हणतो, आपण सर्व प्राणी मिळून जंगलात सहलीला जाऊ या का ? सर्व प्राणी एकमेकाकडे बघून हो म्हणाले. मधेच हत्ती दादा सोंड हलवत म्हणाला पण जायचे कुठे ? ते तर आधी सांगा. लांडगा मान हलवून म्हणाला हो...!  हो...!  कुठे जायचे ते आधी सांगा. नाहीतर आपण माणसाच्या वस्तीत गेलो तर पकडल्या जाऊ. सर्व प्राणी मोठ्यांनी मान हलवून म्हणाले बरोबर आहे. कुठे जायचं ते आधी सांगा. तरच आम्ही सहलीला येऊ. नाही तर आम्हाला नाही यायचे सहलीला. सिंह उभा राहून मोठ्यांने म्हणतो, अरे घाबरू नका. या जंगलाचा राजा तुमच्या सोबत असणार आहे.तुम्हाला कोण पकडते मी बघतोच. आपण जंगलातच सहलीला जाणार आहोत. मानवाच्या वस्तीत नाही. उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सर्वांनी सहलीसाठी माझ्या गुहेसमोर जमा व्हायचे आहे. माझ्या परवानगीने आपण सर्वजण एकत्र सहलीला निघणार आहोत. सर्वांनी माना हलवल्या व सर्व  प्राणी खुशीतच आपापल्या घराकडे निघाले. हरण उड्या मारतच रस्त्याने पळत होते. माकडांनी खूप उड्या मारल्या, हत्ती, जिराफ, लांडगा, कोल्हा, अस्वल, सर्वजण आज खुश होते. कारण सर्वांना सहलीचे निमंत्रण मिळाले होते. रात्र झाली सर्वजण शांत झोपी गेले. हत्ती दादा मात्र रात्रभर जागा होता. कधी सकाळ होईल याची वाट पहात हत्ती जागीच राहिला. सकाळ झाली सूर्यकिरणांनी जंगलात प्रवेश केला तसे ससोबा संपूर्ण तयारीनिशी उड्या मारत मारतच फिरू लागला. चला... चला... रे...!  चला.... चला.... रे...!  सहलीला चला. धावा.... धावा..... पळा...!  धावा..... धावा.... पळा...!  असे म्हणत ससोबा प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन ओरडत होता. सशाचा आवाज ऐकून लांडगा नटून थटून बाहेर आला. अस्वलाने तर मोठे जॅकेट घातले होते. हत्ती दादाने तर स्वतःच्या पाठीवर झूल घातली होती.  हरीण अगदी नाकात नथ घालून मान हलवत सर्वांच्या पुढे येऊन थांबली. सशाने  पायात घुंगरू बांधले होते. त्याच्या टुणुक टुणुक उड्या बरोबर घुंगरांचा आवाज येत होता. राजाच्या गुहे  बाहेर सर्व प्राणी बिनधास्त येऊन उभे होते. सिंह थोड्या वेळाने गुहे बाहेर आला. सर्व प्राण्यांवर नजर टाकुन कोण कोण आले ते बघतो. सिंह हसतच म्हणाला गमंत झाली. माकड मामा आलेच नाही. ससोबा माकड मामाला नाही बोलून आणले का ? ससा म्हणाला , " मी तर सर्वांना आवाज दिला होता ".  मग माकड का बर आले नसेल , म्हणून ससोबा पुन्हा टुणुक टुणुक उड्या मारत जंगलात गेले. झाडाच्या खाली उभे राहून मोठ्याने आवाज देऊ लागले. माकड मामा....!  माकड मामा...!  चला.... चला.... सहलीला चला...! माकडाला मात्र सहलीच्या खुशीमध्ये येवढी गाढ झोप लागली होती की, अजूनही माकड झोपेत होते. ससोबाच्या आवाजाने पटकन उठुन  शेपटीला छान गोंडा बांधला.व ससोबा  बरोबर उड्या मारत मारत गुहेबाहेर आले. सिंहाने सर्वांना सूचना दिल्या. जंगलात फिरताना काय  काय काळजी घ्यायची हे सर्वांना सांगितले. सर्वांनी मान हलवून सूचनांचे पालन करण्याचे कबूल केले. शेवटी सशाने  मोठ्याने घंटी वाजवली. व सिंहाच्या मागे सर्व प्राणी सहलीसाठी निघाले. दिवसभर सर्व जंगलात सर्व प्राण्यांनी खूप मजा केली. एकमेकांची घरे बघितली, वेगवेगळी झाडं बघितली, जंगलातील वेगवेगळी फळे, फुले, रस्ता, पाणी  या सर्वांची  गंमत पाहिली. आपण सर्वजण या जंगलात रहात असून कधीही एकमेकांच्या भितीने एकमेकांच्या घरासमोर आलो नाही. त्यामुळे आपण एकत्र राहतो  कधी आपल्याला कळलेच नाही. अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. शेवटी दिवस मावळायला आला सर्वजण चालून चालून थकले होते. हत्तीदादा तर म्हणाला बाप रे....! मी किती थकलो. मला तर चालता पण येऊ लागले नाही. हरीण  मध्येच म्हणाली , " हत्तीदादा तुम्ही तर आमच्या पेक्षा सगळ्यात मोठे "  मग तुम्ही कसे काय थकले. हत्ती मध्येच म्हणाला , " अगं हरिन ताई माझं शरीर मोठे "  त्यामुळे त्यामुळे मला पटापट चालताही येत नाही. मी हळूहळू चालत चालत तुमच्या सर्वांच्या मागे आज खूप थकून गेलो. मला तर कुणीतरी उचलून घ्यायला पाहिजे.हरीण  मोठ्यामोठ्याने हसून म्हणाली , " हत्तीदादा अशी गंमत करू नका "  आम्ही सगळे प्राणी तुम्हाला साधे उचलू शकत नाही. तर पाठीवर घेऊन कसे जाणार. अशा प्रकारे प्राण्यांच्या गमती जमती मध्ये आजचा दिवस फार आनंदात गेला होता. सगळ्यांनी सिंहाच्या गुहे बाहेरून सिंहाला धन्यवाद दिला. ससा मध्येच म्हणाला राज्याच्या परवानगीने आपल्या सर्वांना सहलीचा आनंद घेता आला, पण मी तर काल पासून किती धावपळीत होतो. सर्वांना निमंत्रण मीच दिलं, सर्वांना सकाळी उठवायला पण मीच आलो  होतो. पण मला काही कुणी धन्यवाद दिले नाही. माकड मध्येच उड्या मारत म्हणाले ससोबा तुलाही खूप खूप धन्यवाद. ससोबा भाऊचा जय जयकार असो....!  असे म्हणून सगळे प्राणी आपापल्या घराकडे निघून गेले. सिंहालाही आजच्या सहली मुळे खुप बरे वाटले होते. आपण सर्व प्राणी एकमेकांशी यापुढे असेच प्रेमाने वागूया. एकमेकांची भीती न बाळगता सर्वांनी एकत्र या जंगलामध्ये वास्तव करूया. असे म्हणून सिंहाने आपल्या गुहेचा दरवाजा बंद केला. सिंह  शांत झोपी गेला. 

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852

Friday, 4 September 2020

ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा सन्मान

    ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा सन्मान

5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक करत असलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास गौरवांकित करण्याचा हा दिवस होय. कुटुंबात लहान मूल जन्माला आल्यानंतर प्रथम त्याची आई त्याचा पहिला गुरू होते. आपल्या मुलावर जगातील उत्तम असे संस्कार करण्याचे कामही करत असते. जीवनातील दुसरा महत्त्वाचा उत्तम संस्कार म्हणजे शिक्षण होय. शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल ठेवल्यापासून ते मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य शिक्षण, ज्ञान घेत असतो. प्रत्येकाच्या जीवनातील दुसरा गुरु म्हणजे शिक्षक होय. संपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षणामुळे मनुष्य समृद्ध बनतो. त्याचा सर्वांगीण विकास साधला जातो.  शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. विज्ञान व तंत्रज्ञानाने एकविसाव्या शतकात प्रचंड प्रगती केली.पण आजही खडू-फळा, शिक्षक-विद्यार्थी या प्रक्रियेतून मिळणारे शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकास साधणारे आहे. आज 3G  4G 5G  च्या जमान्यात आजही गुरुजी महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही. शिक्षकांमुळे विद्यार्थी  घडतो, हा विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे. जुन्या काळातील गुरुकुल पद्धती होती तिला फार महत्त्वाचे स्थान होते. विद्या मिळवताना गुरू पूजनीय समजले जायचे. गुरूचा आदर सत्कार केला जायचा. आज मात्र समाजात शिक्षकांचा आदर कमी झाला आहे. शिक्षकांविषयी समाजाची भावना पैसे देऊन शिक्षण विकत घेण्यापुरती झाली आहे. शिक्षक हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे. गुरुचे स्थान मोठे आहे  ते मोठेच राहणार.5 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक कार्यरत शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे. पालक, गावकरी, समाजाने शिक्षकांच्या कार्याचा या दिवशी सत्कार करून त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांप्रदायिक याठिकाणी सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच शिक्षकांनी घडविले आहे हे विसरून चालणार नाही. जन्मता कोणीही मोठे नसतात.ती स्वतःच्या कर्तुत्वाने व शिक्षकांच्या ज्ञानदानाने मोठे होत असतात. पहिलीपासून ते वेगवेगळ्या शिक्षण शाखेमध्ये शिक्षक काम करत असतात. प्रत्येक विद्याशाखेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी  सदैव प्रयत्नशील असतात. यापुढेही प्रयत्नशील राहतील. फक्त गरज आहे ती शिक्षका प्रति आदर बाळगण्याची व त्यांचा योग्य तो मान सन्मान राखण्याची. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा कौतुक सोहळा संपन्न होत असतो. महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचा मनापासून कौतुक करूया. व पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देऊया. पुढील काळातही शिक्षणाचे हे पवित्र कार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांना खुप खुप शुभेच्छा. 

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Sunday, 30 August 2020

अव्यक्त प्रेम ( लघुकथा )

अव्यक्त प्रेम ( लघुकथा ) 

आज सकाळपासून थंड गार वारा सुटला होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने गुलाबी थंडी सगळ्यांना हुडहुडी भरवत होती. झोंबणार्‍या थंडीपासून बचावासाठी सगळे जण काहीना काही उपाय करत होते. म्हातारी माणसं अंगावर घोंगडी, चादर गुंडाळून बसायचे. लहान मुलं स्वेटर व डोक्यात गोंड्याची टोपी घालून बिनधास्त खेळायची. तरुण पोरं सकाळी सकाळी कचरा पेटवून मोठा जाळ करत त्याच्या भोवती शेकत बसायची. हिवाळा जणू सगळ्यांना थंडी बरोबर मस्ती व आनंद वाटत फिरायचा. आज सकाळीच मी या कडाक्याच्या थंडीत आवरून गावातील महादेवाच्या मंदिरात निघाले. आईने मोठ्याने ओरडून सांगितले. अंगावर ने गं ! पोरी काहीतरी….! थंडी जास्त आहे. आई मी देवळात चालले ....! बाहेर फिरायला नाही. देवळात अंगावर घेऊन गेले तर, तिथला पुजारी हसेल की? मला….! असे म्हणून मी पूजेचे ताट घेऊन मंदिराकडे जायला निघाली. जातांना वाटातल्या मैत्रिणींना आवाज देऊन त्यांनाही सोबत घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेले. मंदिरातील पुजारी काका नुकतीच पूजा करत होते. मी व माझ्या मैत्रिणींनी महादेवाच्या पिंडीची पूजा करून दर्शन घेतले. व देवळाबाहेर येऊन आम्ही सर्वजणी पायरीवर बसलो. सकाळी सकाळी धुक्याच्या थंडीतून वाट करत सूर्यदेवांनी आपल्या किरणांनी हळूच प्रकाश टाकला. प्रकाशाबरोबर नवचैतन्य जणू बाहेर आले होते. अगदी प्रसन्न अवस्थेत पुजारी काका पूजा आटोपून मंदिराच्या पायऱ्या उतरत होते. मी हळूच आवाज दिला     ‘‘ काका प्रसाद द्या आम्हाला ’’ पुजारी काकांनी आवाज ऐकताच….! मध्येच थांबून आम्हा मुलींना प्रसाद दिला. पोरींनो आज सकाळीच थंडीत महादेवाच्या दर्शनाला कसं काय? सहज आलो काका….! कालच बारावीची परीक्षा संपली. आलो मग महादेवाच्या दर्शनाला मी महाराजांना सांगितले. छान....! बरं झालं की, सकाळी सकाळी महादेवाला ही नवीन भक्तांचे दर्शन झाले. नाहीतर ! रोज सकाळी माझ्या भेटीने महादेवाला ही कंटाळा आला असेल.....! असे म्हणून, हसत....! हसत....! पुजारी काका मंदिराच्या पायऱ्या उतरून निघून गेले़. मी व माझ्या मैत्रिणी सुद्धा हसत हसत पुन्हा एकदा पायऱ्यावर येऊन बसलो. सकाळच्या धामधुमीत गावातील सगळी लोकं आपापल्या कामधंद्यात व्यस्त होती. तेवढ्यात गावातील विस वर्षांचा गोरापान, उंचापुरा तरुण धोतर नेसून, खांद्यावर घागर घेऊन मंदिराकडे येत होता. माझे त्या तरुणाकडे लक्ष गेले. तेवढ्यात तो तरुण मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात निघून गेला. मी व माझ्या मैत्रिणी सुद्धा घराकडे जायला निघालो. मंदिराच्या पायऱ्या उतरता उतरता मी मात्र त्या तरुणाच्या विचारात हरवून गेले. कोण असेल तो तरुण? किती भक्तिभावाने सकाळीच महादेवाच्या पूजेला आला. एका हातात धोतराचा घोळ धऊन व दुसऱ्या हाताने खांद्यावर घागर धरून झपाझपा पायऱ्या चढत होता. किती त्याच्या चेहऱ्यावर तेज होते. मी हरवलेल्या विचारात असतानाच मैत्रिणीं हळूच म्हणतात. येतो गं उमा आम्ही...! मी दचकून हो....! हो....! या गं….! असे म्हणून, मी घरी पोहोचले. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. आता अभ्यासाचा ताण नाही. या सुट्ट्या अगदी आनंदात व मस्तीत घालवायच्या असे मी मनाशी ठरवले होते.

             पोरीने तालुक्याच्या गावाला जाऊन बारावीची परीक्षा दिली. या अभिमानाने माझ्या वडिलांचा ऊर भरून आला होता. ते खूपच खुश होते. बाबांनी दुपारी आईला आवाज दिला. ऐकतेस का गं….! उमा कुठे गेली? सकाळ पासुन दिसलीच नाही. ‘‘ मगाशीच जेवून झोपली ती आतमध्ये ’’ आई चिडुन बोलली. परीक्षा संपली ना….! त्यामुळे पोरीचे पाय कुठे एका जागेवर आहेत. सकाळपासून नुसती फिरत आहे इकडून तिकडे, आई बाबांना सांगत होती. बरं....! बरं....! झोपू दे तिला. आपल्या घराण्यात गेल्या अनेक पिढीत एकही मुलगी बारावी शिकली नाही. आपल्या लेकीने तालुक्याला जाऊन बारावीची परीक्षा दिली. महादेवाच्या कृपेने सगळं काही छान होत आहे. उमाला जास्त कामाला लावू नको ! ती आधीच अभ्यास करून थकली त्यात पेपरं दिली. आता तिला आराम करू दे….! आई मधेच चिडुन म्हणाली ‘‘ तिच्या मनाला वाटेल ते करत बस म्हणा ’’ , पोरीने बारावीची अवघड परीक्षा दिली हे खरं आहे ! म्हणून तिला डोक्यावर घेऊ नका….! उमा लेकीची जात आहे. एक ना एक दिवस दुसऱ्याच्या घरी नांदायला जावं लागणार….! नुसते शिक्षण असून चालणार नाही. तर घरातली कामं पण करता आली पाहिजे. एवढ्या दिवस नुसती शाळा....! शाळा....! शाळाच होती. आता मी तिला घरातली सर्व कामं शिकवणार आहे. तुम्ही लय लेकीची बाजू घेऊ नका ! मला पण तिची काळजी आहे. आई मोठ्या मोठ्या आवाजात बोलत घरात निघून गेली. थोड्यावेळाने आईने मला आवाज दिला. उमा....! ये उमा….! उठ आता. किती वेळ झोपणार. हात-पाय, तोंड धुऊन देवाला दिवा लाव. आईने आवाज देताच मी दचकून उठले. बापरे....! किती वेळ झाला झोपून. किती दिवसांनी दुपारी शांत झोप लागली. मी गरम पाण्याने हात तोंड धुऊन फ्रेश झाले. देवापाशी दिवा लावला, देवाला हात जोडून नमस्कार केला. मिटलेल्या डोळ्यापुढे अचानक महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्यावर चढणारा तो तरूण आठवला. त्या आठवणीने जरा प्रसन्न वाटले. त्या दिवसापासून का कुणास ठाऊक ! तो तरुण आठवला की मला खूप छान वाटायचे. सुट्टीचे दिवस मजेत चालले होते. रोज धमाल-मस्ती, मैत्रिणीसोबत गप्पा-टप्पा मारत वेळ जात होता. उद्या सोमवार आहे सकाळीच महादेवाच्या देवळात जाऊन येऊया असा मनाशीच मी विचार करत होते. विचार करत करत मला कधी झोप लागली कळले सुद्धा नाही. सकाळी लवकर उठून महादेवाच्या दर्शनाला मी निघाले. आज मात्र मी मैत्रिणींना सोबत घेतले नाही. मी एकटीच सकाळी सकाळी मंदिरात पोहोचले. पुजारी काका पूजा करतच होते. मी महादेवाच्या पिंडीची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. बाहेर येऊन मंदिराच्या पायरीवर थोडावेळ बसले. तेवढ्यात त्यादिवशीचा तो तरुण आजही उघडा धोतर नेसून, खांद्यावर घागर घेऊन, मंदिराकडे येत असलेला मला दिसला. मी एकटक त्या तरुणाकडे बघतच राहिले. तो झपाझपा मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला. मी आज त्याला मन भरून पाहिले होते. अगदी उंचपुरा, गारशे डोळे, देखणा होता तो….! त्याला बघून मला प्रसन्न वाटले. चला महादेवा बरोबर याही महादेवाचे दर्शन झाले असे मनाशी पुटपुटत मी घरी आले. आज दिवसभर मात्र त्या तरुणा विषयीचे कुतूहल मनात सारखे घोळत होते. मी आता देवळात जायला सोमवारची वाट बघत नव्हते. मी रोज देवळात जाऊ लागले. महादेवा बरोबर त्या तरुणाचे दर्शन मला घ्यावे वाटू लागले. पायऱ्या चढत चढत तो तरूणही माझ्याकडे चोरून बघायचा. पण मी त्याला बोलायची हिम्मत केली नाही. मी रोजच महादेवाच्या देवळात जाऊ लागले. याने माझे बाबा खूप आनंदी होते. पोरगी खूप धार्मिक झाली असे त्यांना वाटू लागले. मी एक दिवस ठरवले ! कोण कुठला हा तरुण? रोज मंदिरात येतो. या अगोदर त्याला आपण पण गावात कधीच बघितले नाही. हा गावात कुठेही दिसत नाही. मात्र मंदिरात हमखास येतो. केवळ योगायोग का होईना परंतु सुरुवातीला तो मला भेटत गेला. उद्या मात्र त्याला नाव गाव विचारायचे. ठरल्याप्रमाणे मी मंदिरात आले. महादेवाचे दर्शन घेऊन पायरीवर बसले. तो तरुण  नेहमी प्रमाणे हातात धोतर धरुन, खांद्यावर पाण्याची घागर घेऊन पायऱ्या चढत चढत मंदिराकडे येत होता. माझ्या जवळ येताच ! मी त्याला आवाज दिला. कोण आपण? नवीन दिसता या गावात ! तो मात्र एकही शब्द न बोलता मंदिरात निघून गेला. मला जरा आश्चर्यच वाटले ! तो एक शब्दही न बोलता निघून गेला. एकतर बहिरा असावा, नाहीतर जास्तीचा शहाणा तरी असेल ! असे मी मोठ्यांने पटकन बोलून गेले. आज मात्र तो घाईगडबडीत पूजा करून मंदिराच्या बाहेर आला. मी मात्र त्याच्या शांत राहण्याने रागावून अध्यापही पायऱ्यावर त्याच विचारात बसून होते. तेवढ्यात त्याने मला हळूच आवाज दिला. मगाशी आपण मला आवाज दिला होता ना....! हो....! पण आपल्याला ऐकू येत नाही वाटतं ! तो तरुण गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘‘ तसे नाही काही, मला छान ऐकू येते ’’ पण मी सकाळी महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणालाच बोलत नाही. माझा तसा नियमच आहे. अरे वा....! छान....! नियम आहे तुमचा ! आम्हाला नाही असे नियम वगैरे आवडत. देवाने छान तोंड दिले सगळ्यांना बोलण्यासाठी त्याला कशाला नियम हवेत. मी नेहमी कधी कुणाशी न बोलणारी आज मात्र या अनोळखी तरुणाशी धीटपणे बिनधास्त बोलत होते. मधेच तो म्हणाला, ‘‘ मी महादू मिठाईवाला ’’ आम्ही या गावचे नाही. आम्ही मूळचे ''राजस्थानचे'' आहोत. माझ्या बाबाचा मिठाई चा व्यवसाय आहे. आम्ही गावोगाव मिठाई विकत फिरत असतो. या गावात मिठाईचा व्यवसाय बरा चालतो म्हणून गेल्या सहा महिन्यापासून येथेच वास्तवास आहोत. मला लहान पणापासून महादेव खूप आवडतो. म्हणून माझे नावही महादूच पडले. तसे माझे जन्मनाव खरे “ चंदनशिव '' आहे. तसेही माझ्या दोन्ही नावात महादेव आहेतच की ! तुम्हाला जे आवडेल ते लक्षात ठेवा. तुमचे काय नाव? तुम्ही पण रोजच महादेवाच्या देवळात येत असता ! तुमच्याही नावात....! महादेव आहे की काय? अगदी गोड आवाज होता महादूचा. अतिशय प्रेमळ व चांगल्या भावनेने तो माझ्याशी बोलत होता. जणू आमची खूप दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बोलत उभे होतो. मी एका अनोळखी तरुणासोबत बिनधास्त बोलत आहे याचे भान मला राहिलेच नव्हते. महादूने मला पुन्हा एकदा विचारले. तुमचे नाव काय? की तुम्हाला पण ऐकू येत नाही. मी मगाशी त्याला बहिरा म्हणाले त्याने ते ऐकले होते. मी त्याला नाव न सांगता तसेच लाजत....! लाजत....! पटापटा पायर्‍या उतरून घराकडे निघून आले. महादू खूप वेळ एका जागेवर उभा राहून मला बघतच होता. रोज वाटायचे हा तरुण कोण आहे. आज मात्र त्याच्याशी बोलून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. किती गोड आहे नाव त्याचे 'चंदनशिव ' अगदी नावाप्रमाणे शिवाचा भक्त शोभतो.

             मी आता महादेवाच्या देवळात न चुकता रोज जाऊ लागले. महादेवा बरोबर महादुचेही दर्शन घेण्याचा नित्यक्रमच माझा झाला होता. मला महादू आवडू लागला होता. मला त्याच्याविषयी आकर्षण वाटू लागले होते. सहज म्हणता म्हणता मी त्याच्या प्रेमात पडले होते. आज मात्र कमालच झाली होती. तो माझ्या आधी देवळात येऊन पूजा करुन पायऱ्यावर माझी वाट बघत होता. मी मंदिराच्या पायऱ्या चढून त्याच्या जवळ जाताच त्याने आवाज दिला. ‘‘ उमा हा घे प्रसाद, मी बनवलेली मिठाई आहे.’’ तुझ्या नावा इतकीच मिठाई पण गोड आहे. असे म्हणून महादू निघून गेला. मी मात्र विचारात पडले ! आपले नाव याला कसे काय कळले. महादू मिठाईवाला होता खरा ! पण मिठाई इतकाच दिसायला गोड, स्वभावही गोड, व बुद्धीने ही गोड होता. त्याने पुजाऱ्यांकडून माझ्या विषयीची सर्व माहिती मिळविली होती. माझ्याप्रमाणे मीही त्याला खूप आवडत होते पण त्याने तसे कधी बोलून दाखवले नाही. लोकांच्या नजरा चुकवून मंदिरात भेटणे, बोलणे आमचे सुरूच होते़. सकाळी सकाळी जणू महादेव पुजारी, महादू व मी फक्त आम्हा तिघांनाच बोलवत होता. आमच्या तिघांशिवाय सकाळी कोणीच लवकर मंदिराकडे येत नव्हते. त्यामुळे आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बसून एकमेकांशी बोलत बसायचो. एकमेकांच्या आवडी निवडी, स्वभाव, विचार, आचार माहिती झाले होते. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण तसे कुणी बोलून दाखवत नव्हते. त्यामुळे आम्ही मित्र म्हणून एकमेकांशी वागत होतो. आमची मैत्री देवळातील महादेवाला, पुजारी काकाला व आम्हालाच माहित होती. आम्ही पुजारी काका इतकेच महादेवाचे भक्त झालो होतो. महादुमुळे मलाही भक्तिची गोडी लागली होती. माझे प्रेम मुळातच तारुण्यातील जरी होते तरी ते भक्तीच्या गोड रसाळ वाणी प्रमाणे होते. मला महादू मनापासून आवडायचा तो त्यातील सद्गुनामुळे ! त्यामुळे आमच्या प्रेमात कृष्ण-राधे सारखा मैत्रीचा प्रेम भाव अधिक होता. बारावीच्या परीक्षेनंतरचा सुट्टीचा कालावधी महादुच्या प्रेमात मजेत जात होता. थंडी म्हणता म्हणता हिवाळा व उन्हाळा दोन्ही ऋतू कधी संपले कळलेच नाही. निकालाची तारीख जवळ येत होती. मी पास झाल्यावर महादू स्वतः तयार केलेली मिठाई देवळात महादेवा जवळ ठेवणार होता. मी त्याला सांगून ठेवले होते मी पास झाले की माझ्या बाबांना घेऊन तुझ्या मिठाईच्या दुकानात येईल. महादू ऐरवी मला अनेक वेळा दुकानात यायला आग्रह करत असे पण कारण सापडत नव्हते. त्यामुळे निकाला शिवाय ते शक्य होणार नव्हते. तू तयार केलेली मिठाई मला विकत देशील ! मी ती मिठाई घेऊन सायंकाळी देवळात येईल. तू सुद्धा सायंकाळी देवळात ये असे आम्ही एकमेकांना सांगून ठेवले होते. आमच्या मैत्रीविषयी माझ्या बाबांना, आईला कोणालाच काही माहीत नव्हते. आम्ही दोघे मंदिरात चोरुन भेटायचो ! त्यामुळे फारसे कोणालाच आमच्यावर शंका येण्याचे कारणच नव्हते.

                    अखेर निकालाचा दिवस उजाडला. मी सकाळीच महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. चांगले मार्क पडण्याचे देवाला साकडे घातले. महादुने प्रसन्न चेहऱ्याने मला शुभेच्छा दिल्या व सायंकाळी माझ्या हाताने तुला मिठाई भरवेल असे सांगीतले. मी लगबगीने घरी आले. बाबा निकाल बघायला तालुक्याला जाणार होते. आज सकाळपासून घरात निकालाच्या उत्साहाची धामधूम होती. आई तर नेहमीप्रमाणे माझ्यावर चिडून होती. ‘‘ कारटी काय दिवा लावते महादेवास ठाऊक ’’ असे म्हणून आई देवघरात दिवा लावते. बाबा तालुक्याला निकाल पाहण्यासाठी जातात. मी व आई घरी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. दुपारचे तीन वाजले होते बाबा अचानक दारात येऊन उभे राहतात. मी पळतच बाबा जवळ जाऊन विचारले, ‘‘ बाबा कसा लागला निकाल ’’ बाबा जोरात म्हणतात, ‘‘ माझं लेकरू पास झालं ! ’’ शाळेतून पहिला क्रमांक आला पोरी तुझा ! बापाचं नाव कमावलं ! माझ्या निकालाने बाबांना खूप आनंद झाला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बाबांनी येतानाच तालुक्यावरून मिठाई आणली होती. मी पळत पळत देवघरात जाऊन देवाच्या पायाशी मिठाई ठेवली. आईला, बाबाला मिठाई भरवली. आईबाबांनी सुद्धा मला मिठाई भरवली. आज घरात सगळेजण आनंदाने नाचत होते. निकालाच्या आनंदाने कधी वेळ निघुन गेला कळलेच नाही. रात्र झाली ! मला एकदम महादू ची आठवण झाली. त्याला मी मिठाई घ्यायला येईल असे सांगितले होते. तो बिचारा माझी वाट पाहत असेल. कदाचित मी गेले नाही म्हणजे नापास झाले असेल ! असा तर त्याचा समज झाला नसेल. आपण ठरल्याप्रमाणे मंदिरात जायला हवे होते. मी पास झाले हे महादुला कळवायला पाहिजे होते. माझा पहिला नंबर आला ! हे ऐकून त्याला खूप आनंद झाला असता. मला त्याच्या हातची मिठाई खायची होती. या निकालाच्या घाईगडबडीने मी सायंकाळी मंदिरात जायला विसरून गेले. मला महादुची खुप आठवण येत होती. पण काय करणार ! आता तर रात्र झाली. मी ठरविले ! उद्या सकाळीच मंदिरात जायचे. महादेवाचे दर्शन घेऊन ही गोड बातमी महादुला सांगायची. त्याच्या हातून मिठाई खाता खाता त्याला सांगून टाकायचे. तू मला खूप आवडतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही उमा तुझी कायमची व्हायला तयार आहे. त्यालाही मी आवडते ! तो माझ्या प्रेमाला नाही म्हणणार नाही मला विश्वास आहे. कोण कुठला महादू....! कुठून आला....! कुठे जाणार....! कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याचा मी विचारही केला नव्हता. याविषयी त्याला कधी विचारले सुद्धा नाही. माझ्या स्वच्छ, सुंदर, प्रेमळ मनाने महादुला स्वीकारले होते. प्रेमाला जात, पात, धर्म, गरीब, श्रीमंत, प्रांत हा भेद नसतो हे माझ्या प्रेमाने दाखवून दिले होते. महादु माझा झाला नाही तरीही उमा मात्र महादुची झाली होती. महादेवाच्या आशीर्वादाने व साक्षीने मी महादुच्या प्रेमात पडले होते. हे मात्र खरं आहे ! तो मला पहिल्यांदा मंदिराच्या पायरीवर भेटला. आयुष्यात यापुढे उमा महादुचा हा जोडा आयुष्यभरासाठी मंदिराच्या पायरीवर एकत्र घट्ट जोडावा एवढीच माझी इच्छा आहे. त्या दिवशी रात्री महादूच्या आठवणीत कधी झोप लागली कळलेच नाही. मी सकाळी लवकर उठून ! पूजेचे ताट घेऊन खुशी खुशीत मंदिरात आले. महादेवाचे दर्शन घेतले. महादेवाला महादुची मिठाई ठेवायची आहे म्हणून माझ्या जवळचा प्रसाद मी ताटातच राहू दिला. नेहमीप्रमाणे पायरीवर येऊन बसले. महादुची वाट पहात आतुरतेने दूरवर नजर लावून बसले होते. नेमकी आज महादुला यायला उशीर झाला होता. तो अद्यापही आला नाही म्हणून मला त्याचा खूप राग येत होता. मला स्वतःच्या हाताने मिठाई भरणार होता ! पण आज अध्याप आला कसा नाही ! या विचाराने माझी तळमळ होत होती. मला खुप वेळ झाला होता पायरीवर बसून ! पण महादू आलाच नाही. पुजारी काका नेहमी प्रमाणे पुजा आटपून बाहेर आले. माझ्या जवळ येऊन म्हणाले ‘‘ आता कितीही वेळ दूरवर नजर लावून बसली तरी काही फायदा होणार नाही ’’ महादू आता कधीच येणार नाही. हा घे प्रसाद….! तोंड गोड कर….! महादूने तुझ्यासाठी ही मिठाई माझ्याजवळ दिली आहे. पुजारी काका काय बोलत होते मला कळतच नव्हते. भुवळ आल्यासारखे नुसते मंदिर माझ्याभोवती गरगर फिरत होते. मी नुसती कावरीबावरी होऊन महादुला शोधत होते. पुजारी काका पुढे म्हणाले, ‘‘ पोरी महादु काल सायंकाळी मंदिरात मिठाई घेऊन आला होता. ’’ त्याने तुझी खूप वेळ वाट पाहिली. शेवटी निराश होऊन माझ्याजवळ मिठाई देऊन निघुन गेला. जातांना मला म्हणाला की, ‘‘ मिठाई सकाळी महादेवाला ठेवा व उरलेली उमाला द्या. ’’ तिला सांगा तुझा मित्र महादू रात्रीच गाव सोडून गेला आहे. तेही कायमचे....! पुजाऱ्याचे शब्द ऐकून ! मी मात्र थंडीच्या दिवसात पाण्याचे बर्फ बनावे तशी स्तब्ध गोठुन गेली होते. एका क्षणात स्वप्नांचा डोंगर कोसळून पडला होता. भुंकपाने जमीन हादरावी तसे माझे पाय लटपटत होते. एका क्षणात मी महादुच्या प्रेमात पोरकी झाले होते. अचानक महादुचे जाणे हे अनेक प्रश्नांचे कोडेच आता उरले होते. गुलाबी थंडीत मंदिराच्या पायऱ्यावर सुरू झालेली माझी मैत्रीची प्रेम कहाणी, मंदिराच्या पायरीवरच अशी विस्कटून पडेल असे मला स्वप्नातही कधीच वाटले नव्हते. दोघांनाही एकमेकाचं प्रेम कळलं होतं ! पण ते व्यक्त न होता कायमचं मूकं झालं होतं ! पुन्हा कधीही व्यक्त न होण्यासाठी....! असंख्य प्रश्नांचे काहूर मागे सोडून महादू आयुष्याच्या वळणावर पुन्हा कधी? कुठे? भेटेल याचा ठावठिकाणा न सांगता माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला होता.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजाता  सिंदखेड राजा

जि बुलढाणा फोन नंबर 9823425852

rajendrashelke2018@gmail.com

ब्लॉग वर वाचा

rpshelke.blogspot.com

Saturday, 29 August 2020

जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जगात विज्ञानाने अनेक शोध लावले. विज्ञानाने माणसाचे जीवनमान उंचावले गेले. पूर्वीच्या काळी मनुष्य अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगत होता. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या सुद्धा पुरेशा प्रमाणात त्याला भागवता येत नव्हत्या. याशिवाय त्याला इतर गरजा नव्हत्या असे नाही. परंतु त्या त्या परिस्थितीत तो जीवन जगण्याला प्राधान्य देत होता. जिवंत राहण्यासाठी त्याची धडपड चालत असे. मुळात विचार करणे, शिक्षण घेणे, शोधक वृत्तीला चालना देणे या गोष्टी त्या काळात घडत नसत. यामुळे साधे जीवन जगणे हाच पर्याय त्याच्यापुढे होता. हळूहळू मनुष्य विचार करू लागला. शिक्षणाचे माध्यम उपलब्ध झाले. त्याच्या शोधक वृत्तीचा विकास होत गेला. याच्या जोरावर मनुष्य अनेक शोध साध्य करू लागला. यातूनच शिक्षण, शोध व विज्ञान याच्या जोरावर अनेक नवीन शोध लागत गेले. नवीन शोधाच्या उपलब्धतेनुसार मानवाच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या. स्वतःच्या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, शोध, संशोधन या गरजा निर्माण होत गेल्या. यातून मानवाने स्वतःचे विचार, शिक्षण व बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावले. मग ते शोध प्रत्येक क्षेत्रात लावले गेले. आरोग्याच्या क्षेत्रात मानवाच्या संपूर्ण शरीराचा अभ्यास करणारे शास्त्र शिक्षणाच्या रुपाने समोर आले. आज संपूर्ण मानवी शरीरावर उपचार केले जातात. एवढा प्रचंड मोठा शोध विज्ञानाने लावला. रक्तगट व रक्तातील पेशींचा शोध लावला गेला. परंतु जगात आजही विज्ञान व विज्ञानवादी शास्त्रज्ञ यांना मानवी शरीरातील रक्ताप्रमाणे नविन रक्त निर्माण करता आले नाही. रक्त निर्माण करुन मानवाच्या शरीरात सोडता आले नाही. रक्त निर्माण करण्याचे अनेक प्रयोग झाले. परंतु त्यात अद्यापही यश आले नाही. आज आपण पाहतो मानवाच्या आजारपणात अनेक व्याधीवर शस्त्रक्रिया केली जाते. तसेच नैसर्गिक अपघातातून सुद्धा मनुष्यावर शारीरिक संकटाचे प्रसंग ओढावले जाते. या वेळी त्याला वाचवतांना रक्ताची गरज भासते. मुळात रक्ताची निर्मिती केली जात नाही. रक्त कुठे बाजारात, दुकानात विकत मिळत नाही. रक्त शेतात पिकवता येत नाही. हे दानाच्या स्वरूपाने एकाकडून दुसऱ्या पर्यंत पोहचवता येते. त्यासाठी सुद्धा खूप तपासण्या, रक्त काढणे, रक्ततपासणी, रक्त टिकविणे व गरजेनुसार समोरच्या व्यक्तीला रक्तगट जुळवून रक्त देणे. या सर्व प्रक्रियेला खर्च येतो. अर्थात या प्रक्रिया घडण्यासाठी मनुष्याच्या शरीरातून रक्त काढणे गरजेचे असते. आजकाल आरोग्य यंत्रणेत औषधी बरोबरच रक्त ही महत्त्वाची गोष्ट बनली आहे. याचा विचार करून गावोगाव रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. समाजात रक्तदानासाठी आव्हान केले जाते. परंतु समाजात आजही रक्तदानाविषयी पाहिजे तेवढी जागृती झाली नाही. रक्त दिल्याने प्रकृती बिघडेल, प्रकृती खालावली तर वजन कमी होईल, परत रक्त येणार नाही, रक्ताची रिकव्हरी झाली नाही तर कदाचित जीवितास धोका निर्माण होईल. अशा वेगवेगळ्या वैचारिक गैरसमजुती आहेत. यामुळे अनेक जण रक्तदान करत नाही. रक्तदान हे अतीशय महत्त्वाचे दान आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, ज्ञानदान, मतदान, अवयवदान, नेत्रदान, रक्तदान अशा स्वरूपाने दान दिले जाते. प्रत्येकाला दान देणे शक्य आहे. जो तो आपआपल्या परीने दान करत असतो. परमार्थात अन्नदानाला महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रात ज्ञान दानाला महत्त्व आहे. राजकारणात मतदानाला महत्त्व आहे. आरोग्य क्षेत्रात अवयवदानाला महत्त्व आहे. तसेच मनुष्याला शारीरिक व्याधीच्या संकटातून वाचण्यासाठी रक्ताची गरज आहे. त्यासाठी रक्तदान सुद्धा महत्वाचे दान आहे. आयुष्यात कधी कोणाच्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तीवर जीवन-मरणाचा प्रसंग ओढावेल सांगता येत नाही. अशा वेळी डॉक्टर रक्ताची गरज आहे असे सांगतात. रक्त त्वरित उपलब्ध करावे लागेल अशा सूचना करतात. अशावेळी मनुष्य धावत पळत रक्तपेढीची पायरी ओलांडतो. त्याठिकाणी रक्ताची पिशवी उपलब्ध नसेल तर खूप मोठे संकट उभे राहते. अशावेळी रक्तदानाचे महत्त्व कळते. स्वतःचे प्राण, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीचे प्राण किंवा जवळच्या नातेवाईकांचे प्राण आपल्याला महत्त्वाचे वाटतात. परंतु या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे प्राणही तेवढेच महत्त्वाचे आहे. मग तो आपला जवळचा असो किंवा आपला नातेवाईक नसो. आपल्या एका रक्तदानाने आपण त्याचे प्राण वाचू शकतो. रक्तदान हे असे धन आहे की, मनुष्याचे प्राण वाचवू शकतात. एका रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. माणसाने माणसाला जीवदान देणारे दान म्हणजे रक्तदान होय. आजकाल नैसर्गिक संकटे खूप ओढवली जातात. अपघाता सारखे संकटे पावला पावलावर उभी आहे. तसेच आरोग्याच्या व्याधीमुळे अनेकांना सर्जरी करावी लागते. सर्जरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. यासाठी रक्ताची खूप गरज भासते. यासाठी समाजातील तरुण पिढीने पुढे आले पाहिजे. स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. रक्तदानाची महती प्रत्येकाला कळली पाहिजे. लाखो करोडो रुपये खर्च करून मनुष्य स्वतःचा प्राण वाचवू शकत नाही. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा यामुळे प्राण वाचत नाही. तर योग्य उपचार, योग्य औषधे व वेळेवर रक्त यामुळे मात्र अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते. पैशाची मदत अनेकजण करतात. उपचाराची मदत डॉक्टर करतात. पण रक्तदानाची मदत मात्र सामान्य माणूसच करू शकतो. रक्तदान हे निस्वार्थी दान आहे. आपण दिलेले रक्त कधी कुणाला कामी येईल हे आपल्याला माहित नाही. परंतु निश्चितच एखाद्याचे प्राण वाचेल ऐवढे मात्र खरे. समाजाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. अनेक गावात, शहरात वेळोवेळी रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केले पाहिजे. अशा शिबिरांमध्ये अनेकांनी रक्तदान केले पाहिजे. दर तीन महिन्यानंतर रक्तदाता रक्तदान करू शकतो. अमूल्य असे रक्तदान निस्वार्थी सेवा भावनेने केले जाते. त्याचा मोबदला वाचलेल्या मनुष्याच्या आशीर्वादाने आपल्याला मिळत असतो. जनमानसात आलेल्या संकटात आपण माणुस म्हणून एकमेकांसाठी धावून जाऊया. आपल्या आपल्या परीने रक्तदान करण्यासाठी पुढे येऊया. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून रक्तदान करूया. अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करूया. अनेकांचे प्राण वाचवूया. चला पुन्हा एकदा रक्तदान करू या.

‘‘ एक रक्तदान वाचवेल अनेकांचे प्राण. ’’

‘‘ रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.’’

‘‘ थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याच्या जीवनाचा.’’


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


Monday, 17 August 2020

पोळा (लघुकथा)

                 " पोळा " ( लघुकथा ) 

बाबा.....! ओ......! बाबा....! आपल्याला नवीन बैल कधी घ्यायचा. घेऊ रे बाळा ....! आपल्याकडे पैसे आले की नक्की बैल घेऊ आपण, सखाराम हळू आवाजात मुलाशी बोलला. मलापण बैल घ्यावे वाटतात. पण पैशाचा मेळ बसत नाही. सखाराम निराश होऊन मंग्याशी बोलत होता. मंग्याला काय माहीत बैल घेण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी नगदी पैसेही लागतात. पण यावर्षी पेरणीच्या आधी काहीही झाले तरी बैल घ्यायचेच ! असे सखारामने मनोमन ठरवले. बैल असले की, शेतीची मशागत चांगली होते. पीक पाणी चांगले येते त्याचबरोबर शेणखतही जमिनीला मिळते. असा विचार सखाराम मनाशीच करत बसला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते लग्नसराई धुमधडाक्यात सुरू होती. पाहुण्या राहुण्यांच्या घरी लग्नासाठी येणे जाणे सुरूच होते. सखाराम असाच एक दिवस सकाळीच एका पाहुण्यांच्या घरी पाहूनकीसाठी निघाला. सखारामच्या पत्नीने हळूच आवाज दिला. अहो....! ऐकले का? मी काय म्हणते....! पाहुण्याकडे चाललाच आहे तर, त्यांच्याकडे काढा बैलाचा विषय. किती दिवसापासून बैल घ्यायचे म्हणताय ना ! पाहुण्याकडे बघा विषय काढून. त्यांच्या गावातील कुणाकडे बैलजोडी विक्री असेल तर पाहुणे दाखवतील कि तुम्हाला ! सखाराम चिडून म्हणाला अ....! पाहुण्याकडे बैलाचा विषय काढायला येथे कुठे? नगदी पैसे आहे माझ्याजवळ….! पाहुण्यांच्या कडे कशाला बैलाचा विषय. त्यांनी बैल दाखवले व पसंत पडले तर बोला म्हणतील लगेच किंमतीचे….! मंग काय पैशाची दैना दाखवु तिथे….! पार्वती हळूच म्हणाली,  ‘‘ माझ्यावर काय चिडताय, माझ्यावर चिडून काय बैल फुकट मिळणार आहे. ’’ बैल कुठूनही घेतले तरी पैसे लागतीलच. पैसे ही महत्त्वाचे आहे व बैल सुद्धा. घेऊनच टाकू यावर्षी....! पैशाचे काय? जाईल फिटून कसेबी माला टालावर. तुम्ही फक्त बैल पाहून घ्या. तुमच्या पसंत असेल तर, पुढचे पुढे बघू. सखारामने मुकाट्याने ऐकून घेतले व मान हलवून म्हणाला, बघतो तसे पाहुण्यांना म्हणून, बैलाचे....! बरं....! मी येतो आता….! पोरांवर लक्ष ठेव. त्यांना जास्त वेळ एकटे कुठे जाऊ देऊ नको. घरीच खेळा म्हणा….! ऊन जास्त आहे उन्हाचा चटका लागला तर परत बिमार पडतील. असे बोलून सखाराम पाहूनकीसाठी घरून निघाला. मनात मात्र बैलाचा विषय पक्का करून टाकला.
                     दुपारची वेळ होती पाहूनकीच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून नवीन नवीन पाहुणे येतच होते. बैठकीत पाहुण्यांची गर्दी जमू लागली. हळूहळू नवरदेवा कडील पाहुणे आले मानपान झाला. लग्नाची बोलणी झाली. जेवण आटपलं, लग्नाची तारीख ठरली. कार्यक्रम आटोपला पाहुणेमंडळी शिदोरी घेऊन निघाली. जवळजवळ सांजवेळ झाली सर्व पाहुणे निघून गेली. सखाराम पाहुण्यांना म्हणतो, येतो मी आता….! पाहुणे हळूच म्हणतात, ‘‘ अहो दाजी एवढ्या उशिरा कशाला जाता. ’’ परत आमची बहीण म्हणेल पाहुण्याची लय अडचण झालती का? आलेच  आहे तर थांबा आता आजच्या दिवस. गप्पाटप्पा होईल, आराम होईल सकाळी जा उठून. तसही बैलाचा विषय राहिलाच की आपला बोलायचा. संध्याकाळी बोलता येईल….! थांबूच आजच्या दिवस असे मनाशीच सखाराम पुटपुटला. हो....! हो....! तसा उशीरच झाला. गाड्याही लागतील याचा भरोसा नाही. थांबतो रात्रभर सकाळीच जाईल उठून गावाकडं....! असं म्हणून सखाराम व पाहूणे पुन्हा एकदा घरात बैठकीत येऊन बसतात. पाहुणे सखारामला पीक-पाणी, लेकरां बाळाची खुशाली विचारतात. नवीन काय चाललं दाजी....! काही नाही बस घर शेत....! आणि शेत घर....! दुसरं काय असणार आपल्या नशिबी. पीक पाणी कसे झाले यावर्षी दाजी. बरे झाले जेम….! तेम….! सखाराम हळू स्वरात म्हणाला. माझ्याकडे बैल नाही दुसरे जनावर नाही. आता काय शेतात काम धंदा नाही. चालू आहे लग्न खाणं आरामशीर.
               बरं....! किसनराव मी काय म्हणतो. कुणाकडे चांगली बैल जोडी आहे का विक्री? ‘‘ कुणाला घ्यायची दाजी बैलजोडी ’’ किसनराव विचारतात. मीच घ्यायची म्हणतोय ! दरवर्षी पेरणीच्या अगोदर बैलजोडी नसल्यामुळे मशागतीची लय फजिती होते. पेरणीला पण लय उशीर होतो. जो तो आपली पेरणी आटोपल्यानंतर बैलजोडी देतो. ते पण खरं आहे दाजी….! पण बैलजोडी नाही म्हटल्यावर काही विलाज चालत नाही. आमच्या शेजाऱ्यांची बैलजोडी विक्री आहे. लय माणसं बघून गेली. बैलजोडी तगडी आहे त्यामुळे अजून काही विकली नाही. तुम्ही घ्या दाजी सकाळी बैलजोडी बघून ! तुम्हाला पसंत पडली तर भावाचे बघू पुढच्या पुढे? काय करायचं ते….! किसन तळमळीने बोलत होता. सखाराम म्हणाला, ‘‘ बरं…!  बरं…! बघू की सकाळी ’’ आपल्याला झेपली तर घेऊ नाहीतर देऊ सोडून. गप्पा मारत मारत दोघेही झोपी गेले. सकाळ झाली सखाराम झोपेतून उठला. चहापाणी, अंघोळ आटपली किसन व सखाराम न्याहारीसाठी बसले. दाजी मी दिला निरोप शेजार्‍यांना बैलाच्या बाबतीत थोड्यावेळाने जाऊ बघायला. गप्पा मारत मारत पोटभर न्याहारी करून सखाराम व किसन बैलजोडी पाहण्यासाठी शेजारच्या शेतात निघून जातात. उंचपुरी, लालसर रंगाची, टोकदार शिंगांची, अगदी लुसलुशीत अशी बैल जोडी होती. बैलाच्या मालकाने पाठीवरून हात मारून दाखविला. बैल आतिशय चांगले आहेत. मारत नाही, कामाला, चरायला लय चांगली आहे. दातात पण पुर्ण भरली आहे. किसनरावच्या नेहमीच पाहण्यातील आहे आमची बैल जोडी….! लय लोकांच्या पसंत पडली. पण भावाकडून नाही जुळला सवदा. खरं सांगु का, पाहुणे….! मला बैलजोडी विकायची इच्छा नाही पण पोरीचं लग्न ठरलंय….! त्यामुळे चार पैसे हातात शिल्लक असलेले बरे….! म्हणुन काढली बैलजोडी विक्रीला. बगा तुमच्या पसंत पडली असेल तर किसनरावच्या मध्यस्तीने देऊ हिशोबा हिशोबाने लावून. बैलजोडी सखारामच्या पसंतीला पडली होती. त्यामुळे सखारामने किंमत विचारून घेतली व कळवतो निरोप म्हणून सखाराम व किसन घरी वापस निघून आले. पाहुण्यांचा निरोप घेऊन सखाराम दुपारी आपल्या गावी परतला.
             पार्वती सकाळपासून वाटच पाहत होती. सखाराम घरी येताच लेकरांनी एकच गोंधळ केला. बाबा आले...! बाबा आले....! जसा काही सखाराम खूप दिवसापासून गावी गेला होता. शेवटी बाप आल्याची खुशी लेकरांनी त्यांच्या गोंधळातून प्रगट केलीच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूच पार्वतीने बैलाचा विषय काढला. सखारामने सर्व हकिगत सांगितली. नगदी पैसे असेल तर पंचवीस हजारापर्यंत बैलजोडी मिळते. बैल एकदम खास आहेत पंचवीस हजाराला घ्यायला पुरतात. पण माझ्याकडे जेमतेम दहा हजार रुपयेच आहेत नगदी. बाकीचे पंधरा हजार रुपये आणायचे कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून सखारामने पार्वतीला सुद्धा विचारात पाडले. थोडा वेळ दोघेही पैशाच्या विचारात शांत बसले. अंगणात खेळणाऱ्या लेकरांचा स्पष्ट आवाज येत होता. मध्येच पार्वती म्हणाली, मी काय म्हणते तुम्हाला? बैल जोडी आवडली ना....! मग या घेऊन. मी माझा दागिना देते तुमच्या जवळ तो सोनाराकडे घेऊन जा व मोडीत किती पैसे येतात बघा. बैलजोडी महत्त्वाची आहे. गळ्यातील दागिना काय? कधी नवा करता येईल. पार्वतीच्या बोलण्याने सखाराम भारावून गेला. अग पार्वती....! तुझ्या गळ्यात काही चार-पाच दागिने नाहीत मोडायला.....! एकुंती एक मंगळसूत्राची पोत हाय....! ती कशी काय मोडते. ते तर बाईच्या जातीचा महत्त्वाचा दागिना असतो. नको....! नको....! तो पर्याय नकोच. बघू दुसरी काही व्यवस्था होती का पैशाची. सखाराम उठून बाहेर गेला. दोन दिवस प्रयत्न करूनही पैशाचा मेळ बसत नाही. म्हणून शेवटी सखारामने बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र नेऊन सोनाराकडे मोडीत विकले. त्याचे नगदी अठरा हजार रुपये सखारामच्या हातात आले. दागिन्याचे पैसे व स्वतः जवळचे पैसे घेऊन सखाराम किसनरावच्या गावी गेला. त्यांच्या मदतीने नगदी पैशाने बैलजोडी विकत घेऊन आला. सखाराम बैलांना घेऊन दारात येताच लेकरं उड्याच मारू लागली. लेकरांना खूप आनंद झाला. पार्वती ओवाळण्यासाठी ताट घेऊन बाहेर आली. बैलाच्या पायावर पाणी टाकून बैलांना ओवाळले. भाकरीचा कुटका बैलांच्या वरुन ओवाळून फेकला. मालकीण बाई काय नाव ठेवायचे यांचे आता....! तुम्हीच सांगा. सखाराम हसतच पार्वतीला म्हणाला. हरणा सारखी सुंदर जोडी आहे म्हणून याचे नाव ‘हरण्या’ व याचा सोबती म्हणून याचे नाव ‘सुदाम्या’ ठेऊया. घरात नवीन पाहुणे आल्यासारखे बैलजोडीने घरातील वातावरण आनंदी झाले होते. पार्वतीच्या समजुतदार पणामुळे आज सोन्याचे शिंग दारात आले होते. याचा आनंद सखारामला मनोमन झाला होता. घरचीच बैलजोडी असल्यामुळे शेतीच्या कामाला सुरुवात झाली. दर वर्षीपेक्षा या वर्षी लवकर पाऊस पडला. त्यामुळे पेरणीही लवकर आटोपली. शेतातील माल चांगला उगवला होता काही दिवसांनी खुरपणी, कोळपणी झाली. आता रान हिरवंगार दिसू लागलं होतं. श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. काही दिवसावर पोळा हा सण येऊन ठेपला होता. यावर्षी सुदाम्या व हरण्यामुळे पोळा या सणाला विशेष महत्व आले होते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा सण पोळाच असतो. त्यामुळे सखाराम व पार्वती सुद्धा खूप आनंदी होती. बैलजोडीसाठी यावर्षी नवा साज घ्यावा लागणार म्हणून, पार्वती काही दिवस दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागली. दोन पैसे नगदी मिळाले तर बैलासाठी चांगला नवा साज घेता येईल. श्रावण महिन्यातील दिवस भुरकून निघून गेले. पोळा सहा दिवसांवर आला होता. सखारामने शेजारच्या गावावरून आठवडी बाजारातून सुदाम्या व हरण्यासाठी नवा कासरा, वेसण, कवड्या व घुंगरांच्या माळा, बाशिंग, झुल, हिंगूळ, बेगड असा नवा साज आणला. पोटच्या लेकरा सारखीच हेही दोन लेकरं समजून सखाराम बैलांना खूप जीव लावत होता. सकाळपासून बैलांचा साज घेण्यासाठी बाजारात बाबाच्या मागे मागे फिरणारा मंग्या मात्र खूप थकला होता. जेवून तो आज लगेच झोपी गेला.
        सकाळ झाली दिवस उगवला. पार्वतीने हळूच मंग्याला आवाज दिला. मंग्या….! ये ! मंग्या....! उठ आज पोळ्याचा दिवस आहे ना ! तुला बैल धुवायला जायचे नाही का? तुझ्या बाबासोबत. पार्वतीने आवाज देताच मंग्या पटकन उठला. गडबडीने तोंड धुवुन त्याच्या बाबासंग नदीवर गेला. बैलांच्या अंगावर पाणी उडवून उडवून बैलांना अंघोळ घातली. सुदाम्या व हरण्या खूप गरीब होते. लेकरा पासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही सहज जवळ येऊ देत असत. त्यामुळे मंग्या बैलांना खूप सांभाळत असे. दिवसभर कासरा हातात घेऊन मंग्याने बैलांना गवत चारले. खांदमळन, पोळा, शिळा पोळा असे तीन दिवस त्यांचा सण म्हणून बैलांना फक्त चारा गवत खाणे व आराम करणे एवढेच काम असते. बर का.....मंग्या ! लक्षात ठेव. या तीन दिवसात बैलांना शेतीच्या कामाला जुपायचे नसते. सखाराम मंग्याला समजून सांगत होता. दुपारी बैलांना घेऊन मंग्या बाबासोबत घरी आला. सखारमने सुदाम्या व हरण्याला अंगणात बांधून त्यांच्या शिंगाना हिंगूळ लावू लागला. बैलांना नवीन वेसण, नवीन कासरा लावण्यात आला. गळ्यात कवड्याची व घुंगराची माळ घालण्यात आली. बाशिंग बांधून पाठीवर झुला टाकल्या. शिंगांना नवीन बेगड चिटकवून बैल पोळ्यात जाण्यासाठी तयार झाले होते. आज सुदाम्या व हरण्या ओळखूच येत नव्हते. नवीन साजाने बैलजोडी उठून दिसत होती. शेवटी दुपारचे चार वाजले. गावातील बैल वेशीवर पोळ्यात जाऊ लागली. गावाच्या वेशीवर गावातील सगळ्या बैलांचा पोळा भरत असे. सखाराम मंग्याच्या हातात कासरा देऊन बैलांना घेऊन वेशीवर आला. गावातील सगळे बैल जमा झाले होते. कधी नव्हे ती सर्व बैल सजवून एकत्र आली होती. पोळा खूप भरला होता. सखाराम व मंग्या दोघेही खूप खुश होती. कितीतरी दिवसांची त्यांची इच्छा आज पूर्ण झाली होती. दोघेही बैलांचा कासरा हातात धरून पोळा फुटण्याची वाट पाहत होते. ‘‘ बाबा….! कधी फुटणार पोळा ’’ मंग्या हळूच म्हणाला. सर्व गावातील बैल आले की, पाच वाजता फुठत असतो पोळा. आता थोड्या वेळात फुठेलच पोळा तू आवाजाकडे लक्ष ठेव. आवाज आला की लगेच सर्व लोक बैल घेऊन तोरणा खालुन धावत जातील. आपल्यालाही लगेच धावावे लागेल नाहीतर मागचे बैल आपल्याला तुडवून जातील असे सखाराम मंग्याशी बोलतच होता. तोच डफड्याचा आवाज सुरु झाला. आंब्याच्या पानाचे तोरण आडवे ओढले व पोळा फुटला. पोळ्यातील बैल एका पेक्षा एक जोरात धावत सुटली. कुणाचा बैल निसटून गेला, तर कुणाचा कासरा सुटला. गावातील तुकाराम जोरात पळता पळता पडला बैलांनी त्याला तुडवून काढले. लोकांनी गर्दीतून पटकन तुकारामला बाहेर ओढले. सगळ्या गोंधळात सखाराम दोन्ही बैलांना व मंग्याला घेऊन हळूहळू तोरणा खालून निघाला. बाबा....! बाबा....! पळवा लवकर सुदाम्या व हरण्याला. चला लवकर घरी सगळ्यांच्या आधी….! मंग्याची घाई सुरू होती. शेवटी गावातून चक्कर मारून सखाराम मंग्याला व बैलांना सुखरुप घेउन अंगणात आला. पार्वती बैलांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन उभीच होती. पार्वतीने बैलांना मंग्याला व सखारामला कुंकू लावून ओवाळले. बैलांना पुरणपोळी चारली. बैल शेजारी पाजारी मिरवून शेवटी सखारामने बैल गोठ्यात नेऊन बांधले. स्वतःचे बैल पोळ्यात मिरवून आल्याचा आनंद सखारामच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेतात दिवस-रात्र कष्ट करून शेती पिकवण्या मध्ये राबणारा आपला धनी व सुदाम्या हरण्याच्या कष्टाच्या पाय गुणाने पिकणारी शेती यापुढे आपल्या मंगळसूत्राची किंमत कमीच आहे. सखारामच्या चेहऱ्याकडे पाहून पार्वतीच्या मनात विचार आला. लेकरांना घेऊन सखाराम जेवायला बसला. आईच्या हाताची गरम-गरम पुरणपोळी खात मंग्या हळूच म्हणतो. बाबा.....! रोजच पाहिजे असा पोळा.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा मो नं 9823425852
ब्लॉग वरती वाचा

Monday, 10 August 2020

यमुना ( लघुकथा )

                  यमुना (लघुकथा) 

यमुना ! अग ये यमुना ! काय करतेस ग.....! अगदी जोरा जोरात आवाज देऊन सुद्धा यमुनेने ओ दिली नाही. रोजच्याप्रमाणे मैत्रिणीसोबत यमुना अंगणात खेळण्यात गुंग होती. सकाळी दिवस उजाडल्यापासून तर सायंकाळी दिवस मावळेपर्यंत यमुना अख्ख्या वाड्यामध्ये सारखी मुलींसोबत खेळत असायची. आई बापाची लाडकी एकुलती एक मुलगी ती, जणू राजकन्याच होती. पाच भावंडात सर्वांत छोटी होती. सहाजिकच आई-वडील व चारही भावांनी ज्ञानदेवांच्या मुक्ताई प्रमाणे जीवापाड तिला जपले होते. एखाद्या राज्याच्या राजकन्ये प्रमाणेच तिचे बालपण गेले. बापाचा मोठा वाडा होता. घरात अन्नधान्य, धनदौलत, पैसा आदला मुबलक होता. गावात तिच्या बापाला पाटला एवढाच मान होता. त्यामुळे यमुना ही सर्वांचीच आवडती गावातील सर्व बायका तिचा खूप लाड करायच्या. घरीदारी नुसता लाड….! अन लाडच….! सुरू होता. आईच्या व बापाच्या मायेने यमुना कधी मोठी झाली कळले सुद्धा नाही. यमुना उंचपुरी व धिप्पाड झाली होती. अगदी श्रावणाने जसा निसर्ग बहरून येतो. सगळीकडे हिरवी झालर पांघरली जाते. तसे यमुनेचे तारुण्य सौंदर्याने बहरून आले होते. अगदी कुणाचीही नजर लागावी अशी यमुना दिसत होती. यमुना आपल्या मैत्रिणी सोबत कधी वाड्यावर तर कधी मैत्रिणीच्या घरी जाऊन हसत, खेळत, गप्पागोष्टी मारत दिवस घालवत असे. अगदी आनंद व नवचैतन्य तिच्यात भरले होते. परंतु तिची आई मात्र चिंतेत होती. एके दिवशी यमुनेच्या आईने यमुनेला सांगितले, ‘‘ तू आता घराच्या बाहेर जास्त वेळ जात जाऊ नको ’’ आता तु मोठी झालीस….! लोकांची वाईट नजर तुझ्यावर पडू देऊ नको? लोक काही चांगले नाही. कोमल फुलासारख्या माझ्या मुलीवर कुणाची वाईट नजर पडली तर? नको….! नको….! तु बाहेर जात जाऊच नको. आपला वाडा काय कमी आहे का? हवे असल्यास तुझ्या मैत्रिणींना आपल्या वाड्यावर बोलून घेत जा ! ‘‘ यमुना मोठ मोठ्याने हसतच म्हणाली ’’  आई मी काय आता झोक्यातले छोटे बाळ आहे का? मला हे सर्व सांगायला. मला कळते ग….! सर्वकाही. मी माझी काळजी घेते. तू नको जीवाला घोर लावून घेऊ....! तू रात्रंदिवस फक्त माझीच फिकीर करत असते ग….! तू तुझी पण काळजी करत जा.

                       एके दिवशी यमुनेच्या बाबाने यमुनेला जवळ बोलावून घेतले. ‘‘ यमुना आता मी तुझे लग्न करावे म्हणतोय ’’ आपल्या शेजारच्या गावात पाटलांची बहिण सुगंधा राहते. तिचा एकुलता एक मुलगा आहे. नाव त्याचे राजाराम ! घरी पन्नास एक्कर शेती आहे त्यांचा मोठा वाडा आहे. त्यांना गावात फार मान आहे. मोठा दबदबा आहे त्या घराण्याचा पंचक्रोशीत ! मुलगाही देखणा आहे. सुगंधा आता या जगात नसल्यामुळे पाटलाला राजारामची काळजी वाटते. मी पाटलाकडे अनेक वेळा बघितलेला आहे त्याला, पाटील हे माझे लहानपणापासूनचे मित्र. त्यांचे व आपले अगदी फार जुने संबंध आहे. माणसं अगदी प्रामाणिक विश्वासाची आहेत. पाटीलांनी ‘‘ कधी बोलावून घेऊ मुलाला, असे अनेकदा विचारले.’’ माझा विचार आहे परवा या म्हणून निरोप देतो त्यांना ! चालेल ना….! एवढ्या वेळ शांतपणे उभी असलेली यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. तिच्या लाजण्यातच यमुनेचा होकार समजून आला होता.

                         आज सकाळपासून घरात धामधूम होती. पाहुणे येणार म्हणून घरातील सगळी माणसं….! नटुन थटुन घरातील कामे पटपट आवरत होती. एखाद्या सणाप्रमाणे घराला नवंरूप आलं होतं. घरातील बैठकीपासून ते बाहेरच्या अंगणापर्यंत सर्व घर स्वच्छ व सुंदर सजवलं होतं. सर्वजण आता पाहुणे येतील याची वाट पाहत होते. तेवढ्यात घरघडी बाहेरून जोरातच धावत आला. ‘‘ मालक मालक पाहुणे आले ’’ यमुनाचे बाबा, भाऊ, घरातील माणसं ! सर्वजण पाहुण्यांना घेण्यासाठी घराच्या बाहेर आले. राजाराम त्याचे वडील, काका असे सर्व पाहुण्यांना घेऊन पाटील दारावर आले. ‘‘ रामराम मंडळी ’’ असे जोरात पाटलाने म्हणताच, यमुनेच्या बाबाने आदराने वाकून रामराम घातला. या पाटील आमच्या वाड्यावर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पाहुणे घरात आली चहापाणी झाला. गप्पा मारत मारत पाटलानी सर्वांची एकमेकांशी ओळख करून दिली. बोलता-बोलता बराच वेळ झाला होता. पाटील यमुनेच्या बाबाला म्हणतात, ‘‘ यमुनेला घ्या आता बोलावून ’’ यमुनेच्या बाबाने हाताने इशारा करताच धाकटा भाऊ पटकन उठला व घरात गेला. ‘‘ यमुना चल लवकर ’’ तुला बाबांनी बैठकीत बोलावले. यमुना रोजच्या पेक्षा जास्तच नटुन होती. त्यामुळे अधिकच खुलून दिसत होती. तिच्या आईने तिला जायला इशारा केला यमुना आपल्या भावाच्या पाठीमागे निघाली. ऐरव्ही बैठकीत जाताना यमुना हसत हसत जायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती. सहाजिकच तिला पाहुणे बघायला आले होते. भावाच्या पाठीमागून यमुना बैठकीत आली. पाहुण्यांच्या समोर मधोमध चौरंग ठेवला होता. ‘‘ बस यमुना त्या चौरंगावर पाहुण्यांच्या समोर ’’ बाबा हळूच म्हणाले. यमुना चौरंगावर जाऊन बसली. पाहुण्यांनी यमुनाला नाव गाव, आवडी निवडी विचारल्या व येण्यास सांगितले. यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. पाहुण्यांना यमुना पसंत आली. यमुना व राजारामचे लग्न ठरले. एका महिन्यावर यमुनाच्या बाबांनी लग्नाची तारीख पक्की केली. यमुना व राजारामचे अतिशय धुमधडाक्यात लग्न लावले. सर्वांची लाडकी यमुना आता परक्या घरची धन झाली होती. माहेरवासीन सासरला निघून गेली.

          राजारामच्या घरी यमुनेचे धुमधडाक्यात वाजत गाजत स्वागत झाले. तिने सासरचा उंबरठा ओलांडला व दारावरचे माप ओलांडून यमुना घरात आली. सासर हेच आता यमुनेचे माहेर होते. सासु नसल्यामुळे घरात आल्यापासून यमुनेला राबावे लागणार होते. हळूहळू यमुनेच्या संसाराला सुरुवात झाली. बघता बघता यमुनेला चार मुली झाल्या. गंगा ! भागेरथी ! सावित्री ! गोदावरी ! त्यांचे नाव ठेवण्यात आले. गंगा, भागु, सावित्री, गोदा, यमुना, राजाराम व तिचे सासरे असा त्यांचा परिवार आनंदात राहत होता. एके दिवशी दुपारी अचानक यमुनेच्या बाबांच्या घरचा घरगडी दारात येऊन उभा राहतो व राजारामला बाहेर बोलावून निरोप देतो. यमुनेच्या आईला सर्पदंश झाला व त्यातच तिचे निधन झाले. यमुनेला डोंगराएवढे दुःख झाले. स्वतःची आई गेली या दुःखातून ती सावरते न सावरते ! तेच चार महिन्यांनी आईच्या दुःखाच्या धक्काने तिचे बाबाही वारले. जीवनातील दोन तेजस्वी सूर्य काळाने हिसकावून नेले होते. तिच्या जीवनातील अचानक मायेचा हा प्रकाश आटला होता. इकडे येमुनेच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली असे झाले. राजाराम व यमुनेची एक सारखी कटकट होऊ लागली. राजारामला मुलगा हवा होता. तो यमुनेकडे मुलासाठी सारखा हट्ट धरू लागला. यमुना घरात राबराब राबत होती. मध्यंतरी सासर्‍याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे एक हात व पाय लुळा पडला होता. त्या दिवसापासून म्हातारा एकाच जागेवर पडून होता त्यामुळे म्हातार्‍याचे सर्वकाही यमुनेलाच करावे लागत होते. मुलासाठी राजाराम खूप भांडण करू लागला. यमुनेच्या जीवनात एकामागून एक वाईट प्रसंग घडतच होते. तरीसुद्धा यमुना या प्रसंगांना कशीबशी सामोरे जात होती.

                    अशातच तिला दिवस गेले. आता तरी मुलगा होईल म्हणुन राजाराम यमुनेला बजावत होता. यमुने ! मला मुलगा पाहिजे ! मुलगी झाली तर? मी तुला या घरात ठेवणार नाही. दिवसभर घरकाम, म्हाताऱ्याची सेवा, चार पोरींचे आवरणे यातच यमुना फार थकून  जात होती. वरून राजारामच्या धाकाने तिला एक वेळचे अन्नसुद्धा गोड लागत नव्हते. यमुनेचे दिवस भरत आले होते. राजाराम मुलासाठी अति उत्साही झाला होता. एके दिवशी सकाळी सकाळी यमुनेच्या पोटात दुखायला लागले. राजारामने पळत जाऊन गावातील दायनी मावशीला बोलावून आणले. थोड्या वेळातच यमुनेला गोंडस मुलगी झाली. राजारामला मुलगी झाली कळताच….! राजाराम प्रचंड संतापला. यमुनेवर राग राग करून बाहेर निघून गेला. मुलाच्या हव्यासाने हपापलेला राजाराम या वेळी फार संतापला होता. अतिशय रागाच्या भरात राजारामने आज चुकीचे पाऊल उचलले होते. तो खूप दारू पिला होता. सायंकाळी राजाराम दारुच्या नशेतच घरी आला व खूप भांडण करू लागला. यमुनेला मारहाण केली. यमुना अतिशय दुःखी झाली. पण नशिबापुढे ती तरी काय करणार होती. राजाराम मुलाच्या हव्यासापायी रोजच दारू पिऊ लागला. घरात पैशाची चुणचुण भासू लागली. शेती विकून दारुत पैसे उडवणारा राजाराम व्यसनात पार धुंद झाला होता. एकेकाळी राजकन्ये सारखे वैभव भोगणारी यमुना आज मात्र परिस्थितीने नवऱ्याची गुलाम झाली होती. पाच पोरींचा बाप होऊन सुद्धा राजाराम मुलासाठी हपापलेलाच होता. यमुना मात्र पाच पोरींची आई व घरकाम याने फार अशक्त झाली होती. आता मरण आलेले बरे ! पण लेकरं नको ! अशी तिची मानसिकता झाली होती. पण नवऱ्याची गुलाम झालेली यमुना पुन्हा या मोहाला बळी पडली. यमुनाला सहाव्यांदा दिवस गेले. आतां तरी मुलगा होऊ दे ! नाहीतर मरण तरी दे ! असे यमुनेने देवाकडे साकडे घातले होते. उन्हाने हिरवी वेल सुकावी तशी यमुना यावेळी फार सुकून गेली होती. एका जागेवरून उठणे तिला जमेनासे झाले होते. मात्र राजाराम ठरल्याप्रमाणे दारू पिऊन घरी आला व जोर जोरात यमुने मुलगा ! यावेळेस मुलगा दे मला ! असे बडबडु लागला. दिवस मावळला होता बाहेर अंधार पडला होता. अचानक यमुनेच्या पोटात दुखू लागले. यमुना वेदनेने विव्हळत होती. दुसरीकडे नशेत धुंद असणारा राजाराम मुलगा होतो की, मुलगी या विचारात मग्न होता. गंगाने भागेरथीला पाठवून गावातून दायनी मावशीला बोलावून घेतले. दायनी मावशी आली घराचा दरवाजा लावून पोरींना बाहेर पाठवले. यमुनेच्या आयुष्यात फक्त दुःख आणि वेदनाच भरल्या होत्या त्यामुळे तिला हे नवीन नव्हते. एकेकाळी सौंदर्याने बहरलेली यमुना आता मात्र अशक्त झाली होती. चाळणीसारखे तिचे शरीर खिळखिळे झाले होते.  पाच पोरींची आई होऊन यमुनेचे शरीर हाडांचा सांगाडा झाले होते. नऊ महिने रोजच कटकट व मारहाण यामुळे यावेळेस यमुनेत प्राण उरला नव्हता. यावेळेस तरी मुलगा होईल या आशेवर यमुना कसीबसी धिर धरुन नऊ महीने बळकष्टीने जीवंत होती. या वेळेस तिला अशक्त पणामुळे बाळ पोटाच्या बाहेर ढकलणे सुद्धा जमेना. प्रंचड वेदनेने यमुना ओरडत होती. एक सारखी रडत होती. दायनी मावशी यमुनेला धीर देत होती. पोरी होईल तुझं चांगलं.…! देव काही लय वाईट नाही. तुझ्या नशिबालाच काय हे कष्ट वाढुन ठेवलेत कुणास ठाऊक….! दायनी मवशीच्या आधाराने यमुनाला थोडा का होईना पण मायेचा आधार मिळत होता. थोड्या वेळातच बाळ रडण्याचा आवाज आला ! मावशीने दरवाजा उघडला. बाळाला घेऊन राजारामच्या मांडीवर ठेवून म्हणाली मुलगा झाला तुला….! मुलगा….! झाली का? आता मनाची शांती ! राजाराम नशेतच उड्या मारू लागला. मुलगा झाला ! या राजारामला मुलगा झाला ! गंगा, भागु, सावित्री, गोदा, सिंधू बघा....! बघा....! तुम्हाला भाऊ झाला. बघताय काय? शेजारी पाजारी ओरडून सांगा. ‘‘ भाऊ झाला आम्हाला, भाऊ ’’ मुलाच्या आनंदाने राजाराम पार वेडा झाला होता. यमुना कुठय? ती कशी आहे. याकडे त्याचे लक्षच नव्हते. थोड्यावेळाने गंगा, भागु घरात आली. यमुना एका जागी शांत पडली होती. पोरींनी तिला आवाज दिला. आई….! ये आई….! मुलगा झाला तुला….! यमुना मात्र ओ देत नव्हती. पोरींनी आईला हलवले. आई काहीच हालचाल करत नाही म्हटल्यावर भागु जोरात ओरडली. बाबा....! आईला काय झाले बघा. सावित्री, गोदा, सिंधू पळतच घरात आल्या. राजाराम बाळाला घेऊन डोलत डोलतच घरात आला व यमुनेकडे बघून आवाज देऊ लागला. यमुना ! ये यमुना ! बग मुलगा झाला मला....! मुलगा....! यमुना मात्र आयुष्याच्या सर्व कष्टातून व राजारामाच्या त्रासातून सुटुन एकदाचीच….! कायमची झोपली होती. कधीही न उठण्यासाठी.......!

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852
ब्लॉग वरती वाचु शकता

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...