मानसिक स्वास्थ
अठराव्या शतकापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंत भारत देशाची प्रगती वाढत गेली आहे. अठराव्या शतकातील मानवजात व एकविसाव्या शतकातील मानवजात यात प्रचंड बदल झाला आहे. सुरुवातीच्या काळात मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी खूप संघर्ष, खूप कष्ट करावे लागत होते. प्रचंड आर्थिक कमतरता त्याकाळात भासत होती. अर्थात त्याकाळी व्यवसाय, उद्योग धंदे, शिक्षण, तंत्रज्ञान विज्ञान यामध्ये भारत मागे होता. बारा बलुतेदारी नुसार लोक आपापली व्यवसायाची कामे करत व त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह भागवत असे. त्यावेळच्या कष्टाची चुलीवरची गरमागरम भाकरीची चव मात्र खूप भारी होती. कारण परिस्थिती, काम, कष्ट या गोष्टी लोकांनी आनंदाने स्वीकारल्या होत्या. लोक संकटांना स्वाभिमानाने सामोरे जात असत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर मात्र परिस्थितीचा तीळमात्रही परिणाम होत नसे. लोकांच्या गरजाही खूप कमी होत्या. जीवन जगताना पोटाला पोटभर भाकर, अंगाला वस्त्र आणि राहण्यापुरती जागा एवढे जरी आयुष्यात मिळवता आले तरी खूप सारी संपत्ती जमवली असा माणसांचा समज होता. त्याचे कारण लोकांचे आजच्या तुलनेत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम होते.
एकविसाव्या शतकातील माणसाचे जीवन मात्र उलटे झाले आहे. देशाने प्रचंड प्रगती केली शिक्षण व तंत्रज्ञानात खूप बदल झाले. शहरापासून ते गावापर्यंत शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली. त्यामुळे प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती उच्च शिक्षण घेऊ लागला. शिक्षणाबरोबरच व्यवसाय, उद्योग धंदे, आधुनिक तंत्रज्ञान, नोकरी आदी ठिकाणी रोजगार निर्माण झाला. प्रत्येकाला स्वतःच्या शिक्षणानुसार व अनुभवानुसार रोजगार, नोकरी मिळत गेली. प्रत्येकाला उत्तम पगार, व्यवसायात उत्तम उत्पादन मिळत गेले. त्यामुळे माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा सहज भागत आहे. याशिवाय मनुष्याने स्वतःच्या इच्छेने निर्माण केलेल्या इतरही गरजा मनुष्य भागवत आहे. आज आपण समाजात पाहतो राहणीमान, व्यसन, वेगवेगळ्या प्रकारच्या सुखाची साधने आदी गोष्टीसाठी माणूस प्रचंड खर्च करत आहे. आज अनेक लोकांकडे सर्व सुविधा आहे. चांगली नोकरी, मोठा बंगला, घरासमोर आलिशान चार चाकी गाडी अशा सुखसोयी उपलब्ध आहे. परंतु मानसिक समाधान मात्र नाही. प्रत्येक जण प्रचंड ताण तणावाचे जीवन जगत आहे. घर, कुटुंब, समाज, शेजारी आधी गोष्टी पासूनच्या अनेक समस्या रोज निर्माण होत आहे. मनुष्य या समस्यांमुळे प्रचंड अस्वस्थ आहे. पैसा, प्रतिष्ठा, सुविधा, सुख देतात म्हणून आयुष्यात या गोष्टीमागे मनुष्य खूप धावत राहतो. या सगळ्यांमध्ये मात्र जीवन जगायचे राहून जाते. आज अर्ध्या पेक्षा जास्त काळ सुखाच्या मृगजळा मागे खर्च होतो. मिळवलेल्या सुखसुविधांचा उपभोग घ्यायचा तर मनुष्याच्या मागे आजार, वेगवेगळ्या व्याधी लागतात. त्याचे मानसिक स्वास्थ बिघडून जाते. जीवनाच्या संघर्षात जगायचे राहून जाते. याचे कारण म्हणजे मानसिक स्वास्थ्य चांगले नाही. मानसिक समाधान नाही. प्रचंड ताण तणाव अति प्रगतीची धावपळ त्याचबरोबर वेळेवर जेवन नाही पुरेसी झोप नाही. कामकरण्याचे नियोजन नाही. नियमीत व्यायाम नाही. सर्वांमध्ये निश्चितच मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. आज मित्र, कुटुंब, नातेवाईक, समाज यापासून प्रत्येकजण दुरावत चाललेला आहे. वाचन, संवाद, गप्पागोष्टी, सामुहिक उत्सव, सामुहीक सण साजरे होणे यामुळे मनुष्याचे स्वास्थ्य उत्तम राहते. परंतु आदी गोष्टी मात्र आज घडत नाही. कारण आयुष्यात प्रगतीच्या मागे धावताना कुणालाच मागे वळून पाहवेसे वाटत नाही. म्हणून मनुष्य फक्त धावतोय स्वतःच्या स्वास्थ्याकडे त्याचे लक्ष नाही. मनाला समाधान लाभेल असे काही घडत नाही. यातूनच मानसिक स्वास्थ्य बिघडत जाते. मनुष्यात बदल होत जातो तो एकटा एकटा राहतो. एकटे जीवन जगणे पसंत करतो. स्वतःच्या मनातील विचार, भावना तशाच दाबून ठेवतो. यामुळे प्रचंड ताण तणाव, प्रचंड क्रोध, नैराश्य आदी गोष्टीकडे मनुष्य झुकला जातोय. यामुळे समाजात सर्व गोष्टींनी सर्व सुखांनी समृद्ध असणारी माणसं सुद्धा आत्महत्या करतात. नेमकी याची कारणे शोधणे कठीण होऊन बसते. यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात उपलब्ध सोयीनुसार जीवनात आनंद शोधला पाहिजे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाचा निखळ आनंद लुटला पाहिजे. मनुष्य जीवन हे मुळातच सुंदर फुला सारखे फुलत जाते. फक्त आपल्याला त्याचा सुगंध घेता आला पाहिजे. फुलाचा सुगंध घेतला काय ? किंवा नाही घेतला काय ? ते एक दिवस सुकूनच जाणार असते. म्हणून उमललेल्या फुलाप्रमाणे माणसाने स्वतःचे जीवन आनंदाने बहरून टाकावे. प्रत्येकाने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे स्वतःच्या जगण्याला वेळ द्यावा. जीवन जगण्यासाठी आहे ते व्यर्थ घालवण्यासाठी नाही. प्रत्येकाने मन भरून जीवन जगावे जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. मात्र आजचा मनुष्य जीवन घालवण्यातच व्यस्त आहे. चला जीवनाचा आनंद घेऊया व आनंदी जीवन जगूया. दुसऱ्यांना सुद्धा स्वतःच्या जगण्यातून आनंद वाटूया.
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा......
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा......
पाण्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा........
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा.......
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852
3 comments:
माणसाच्या न संपणार्या अपेक्षा मानसिक अस्वास्थचे कारण.... छान
लेखन सर
,, जन्माला येने आणि मृत्यूला सामोरे जाणे या मध्ये जे आंतर आहे तो काळ म्हणेच जीवन, आयुष्य, लाइफ असे बराच काही...आहे
आजच्या या धावपळीच्या युगात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होते तो म्हणेच वाढती लोकसंख्या, महागाई , रोजगार आणि नव-नविन विकसीत होणारे तंत्रज्ञान.जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न,वस्त, निवारा या मूलभूत गरजा आहे.पण ह्या समाजाने निर्माण केलेले तान,तणाव,कॉम्पिटेशन, असे बरेचं काही आहे आपन या भानगडीत न पडता आपले काम चोख पणेने करता आले पाहिजे नाहीतर हा गोंधळ आपल्याला सुखाने जगू देत नाही.
लोक मोबाइल,पैसा,घमंड, आश्या कारण मुळे एक दुसऱ्याचे वैरि होतात.ते फक्त धाव घेतच राहता. माञ त्यानं काहीं समाधान मिळताच नाही .
त्यामुळे समाधान सोधा प्रत्येकाला वेळ द्या.कारण "लोटकर तो बस यादे आती है, वक्त नाहीं"
समध तयार करत चला स्वतः ता चे स्वत:पुरतेका होईना चागले नाव कामवा.
अशीच मनातील गोष्ट.
छान लेख आहे सर बराच काही शिकायला मळाले.����������
धन्यवाद सर
Post a Comment