Sunday, 26 July 2020

माणसाचा शत्रू '' व्यसन

      माणसाचा शत्रू '' व्यसन ''

भारत हा संस्कृती व परंपरेने नटलेला देश आहे.या देशाला संस्कृती व संस्काराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. या देशाला संत-महात्मे, समाजसुधारक,थोर विचारवंत, शास्त्रज्ञ,अशा सर्वांच्या विचारांची परंपरा लाभलेली आहे.या सर्वांच्या विचारांणवर आज प्रत्येक जण स्वतःला सुशिक्षित समजून घेत आहे. स्वतःच्या सुशिक्षित व उच्चशिक्षित अहंकाराला आधुनिक जगाच्या स्पर्धेत ढकलून देत आहे.या जीवघेण्या स्पर्धेत प्रत्येक जणाला यश मिळवायचे आहे. या स्पर्धेत अपयश पदरी पडले की,ते कुणालाच पचनी पडत नाही.मग हेच अपयश मणुष्याला निराशेच्या खाईत लोटून देते.पुढारलेल्या विचारसरणीला हे नैराश्यपूर्ण अपयश हळूहळू मनाला पोखरून लागते.अशा वेळी मनुष्य सहाजिकच व्यसनाकडे ओढला जातो. माणसाला वेगवेगळी व्यसन जडली जाते.तंबाखू,बिडी, सिगारेट,गुटका, दारू,गांजा,ड्रग्स,कोकेन आधी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं माणसाला जडते.मुळात व्यसन शोक किंवा ऐश्वर्य प्रगट करण्याचे साधन नाही.व्यसन मुळातच वाईट आहे.व्यसनामुळे अत्यंत घातकस्वरूपाचे दुष्परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. त्यातून आर्थिक,कौटुंबिक,मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचे दुष्परिणाम होत असतात.व्यसन करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो.दिवसभरात कमावलेला पैसा व्यसनापायी खर्च होऊ लागला की,निश्चितच आर्थिक चुणचुण भासू लागते.यातूनच मग कुटुंब कलह सुरू होतो.नवरा बायकोचे भांडण,वडील मुलाचे भांडण, भावा-भावाचे भांडणे होतात.कुटुंबाचे आनंदी क्षण व्यसनापायी मावळायला लागतात.मनावरचा ताण कमी होईल म्हणून माणूस व्यसन करतो.मुळात घडते मात्र उलटेच,व्यसनामुळे मानसिक ताण तणाव अधिक वाढतो. माणसाचे मानसिक संतुलन बिघडते. व्यसनात तो काय करतो याचे त्याला भान राहत नाही.आईच्या गर्भातून मिळालेले सुंदर जीवनरूपी शरीर व्यसनामुळे खराब होते.लाखमोलाचे शरीर व शरीराचा एक-एक भाग व करोडोरुपये खर्च करून ही परत न मिळणारे आत्मारुपी देह रोगांना आमंत्रण देत असतो.व्यसनामुळे कॅन्सर,लिव्हरचे खराब होणे,पोटाचे आजार या सारख्या महाभयंकर रोगांना आमंत्रण दिले जाते.व्यसनाच्या धुंदीत मनुष्य या गोष्टीकडे लक्ष देत नाही.एक वेळ स्वतःचे शरीर रोगाच्या स्वाधीन करून.सर्वात शेवटी पश्चातापाचा जप करत बसतो.कारण व्यसनाचा शेवट हा आर्थिक,मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक पश्चातापाचा शिवाय त्याच्याकडे काही उरत नाही. मनुष्याने निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गा सारखे निर्मळ व स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे.आयुष्यात व्यसन करायचेच असेल तर चांगल्या गोष्टीचे केले पाहिजे.ज्यातून माणसाच्या आयुष्याला आनंदी व निरोगी बनवू शकेल.आयुष्यात व्यसन करायचे असेल तर राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊं आईसाहेबांच्या संस्काराचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचे,स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे,व संत गाडगे बाबांच्या स्वच्छतेचे केले पाहिजे.अशा व्यसनाने स्वतःला, कुटुंबाला,समाजाला,या महाराष्ट्राच्या मातीला व भारतभूमीला सुजलाम सुफलाम बनवूया.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मो.न 9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...