पृथ्वीवर अनेक जीव-जंतू,प्राणी,पक्षी राहतात.यामध्ये भुचर व जलचर असे वर्गीकरण केले जाते.सजीव व निर्जीव यांनी नटलेली पृथ्वी आहे.सजीवाचे जीवनमान निसर्गावर अवलंबून आहे.नैसर्गिक साधन संपत्तीने निसर्गाचे सौंदर्य बहरलेले आहे.निसर्गाचे सौंदर्य ही माणसाला देवाकडून मिळालेली अनमोल भेट आहे.मानव निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःचे जीवनमान आनंदात घालवत असतो.भारत देश निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे.यामध्ये हिमालया सारखी पर्वतरांग,के2 सारखे उंच शिखर,देशाच्या तिन्ही बाजूंनी व्यापलेला अथांग सागर,जम्मू-काश्मीर सारखा बर्फाच्छादित भाग याचबरोबर नदी,नाले,तलाव,धरण वेगवेगळे वृक्ष, फळे-फुले,औषधी वनस्पती या सर्वांचा समावेश आहे.अशा अनेक विविधतेने भारत नटलेला आहे.एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाने प्रगतीचे शिखर सर केले आहे.या आधुनिक प्रगतीत काही तोटे सुद्धा झाले आहे.प्रगतीच्या शर्यतीत काही समस्या निर्माण झाल्या आहे.यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे प्रदूषण होय.मानवाने प्रचंड प्रगती केली.स्वतःचे जीवनमान उंचावले.या सर्वांमध्ये प्रदूषण ही समस्या निर्माण झाली. प्रदूषण ही एक समस्या बनली.जी येणाऱ्या काळात मानवाचे जीवनमान व आरोग्यास धोक्याची घंटा आहे.आज आपण पाहतो.प्रदूषणामध्ये ध्वनी प्रदूषण,जलप्रदूषण,हवेचे प्रदूषण या तिन्ही मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.ध्वनी,जल व हवा या मानवाच्या जगण्यातील मुख्य गोष्टी आहे.ज्या प्रदूषण या समस्येने ग्रासलेल्या आहे.या दुष्परिणामाने मानवाचे आरोग्य व आयुष्य धोक्यात आले आहे.शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर आवाज आज नाहीसा झालेला दिसतोय. मानवाच्या वाढत्या अपेक्षा व मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यात मानवाने निसर्गावर अन्याय चालवलेला आहे. आज निसर्गनिर्मित अनेक गोष्टी नाहीशी होताना दिसत आहेत.ज्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे.
1) हवेचे प्रदुषण
वाढती लोकसंख्या,यातून वाढते शहरीकरण,रस्ते,धरण, उद्योगधंदे,तलाव यासाठी दरवर्षी लाखो झाडांची कत्तल केली जात आहे.सहाजिकच वृक्षतोड झाल्यामुळे हवेचा समतोल बिघडला.शुद्ध हवेची जागा अशुद्ध हवेने घेतली. निसर्गनिर्मित गोष्टी हळूहळू कमी होत आहे.मानवनिर्मित गोष्टीची वाढ होत आहे.वाहनांचा धुर,कारखाने,कंपन्या यातुन अशुद्ध असे वायू हवेच्या कुशीत ढकलले जात आहे. अर्थात शुद्ध हवा व हवेतील शुद्ध ऑक्सिजन आज मिळत नाही.अशुद्ध हवेमुळे मानवाच्या हवेमुळे मानवाच्या श्वसन संस्थेवर परिणाम होत आहे.यामुळे मानवाचे जीवन मान कमी होत आहे.निसर्गातून फुकट मिळणारा शुद्ध ऑक्सिजन मानवाला आयुष्य जगण्यासाठी लाख रुपये खर्च करून दवाखान्यात कृत्रिम ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे.ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.माणूस प्रगतीच्या मागे धावत असतांना पृथ्वी,निसर्ग व सजीवांचे आयुष्यमान याकडे लक्ष द्यायला विसरला आहे.प्रगती व पैशाचा अहंकार एक दिवस मानवजातीला घातक ठरेल यात शंका नाही.हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवड झाली पाहिजे.झाडे लावून त्याचे उत्तम संगोपन केले पाहिजे.झाडे हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत करतात.हवेतील शुद्ध ऑक्सिजन वाढवण्याचे काम करतात.निसर्ग एक वरदान आहे.ते वरदान कायम स्वरूपी टिकण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा अति वापर टाळला पाहिजे.हवेत सोडले जाणारे अति विषारी वायू व वाहनांच्या द्वारे सोडला जाणारा धूर यावर बंधने घातली गेली पाहिजे. निसर्गाचा अतिवापर हा सजीवातील मानव घटकच करत असतो.स्वतःबरोबर अनेकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम करीत आहे.
2) जल प्रदूषण
प्रदूषणामध्ये दुसरी समस्या जल प्रदूषण आहे.जलप्रदूषण ही समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रुद्र रूप धारण करुन उभी आहे.दरवर्षी पडणारे पावसाचे पाणी,सांडपाणी व कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.शहरी भागात वाढती लोकसंख्यामुळे सांडपाणी व कचरा ही समस्या मोठी बनली आहे.याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे पावसाळ्यात पडणारा पाऊस हेच घाण पाणी व कचरा स्वतःबरोबर वाहात घेऊन जातो.छोटे तलाव,विहीर,धरण याठिकाणी शुद्ध पाणी अशुद्ध करत आहे.यातून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.अशुद्ध पाण्यामुळे मानवाचे आरोग्य बिघडते.आज आपण पाहतो ग्रामीण-शहरी भागातील लोकांना वेगवेगळ्या शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.जल प्रदूषणामुळे गोड्या पाण्याचे स्रोत दरवर्षी कमी होत चालले आहे.निसर्गाकडून मिळणारी पाणी ही देणगी आज विकत घ्यावी लागत आहे.फुकट मिळणारे पाणी शुद्ध करण्यासाठी यांत्रिक प्रक्रिया करायला पैसे खर्च करावे लागत आहे.आज ग्रामीण भागात सुद्धा पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.मानवाने प्रगतीच्या स्पर्धेत असंख्य नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश लावला आहे.यावर विचारविनिमय करायला मानवाकडे वेळ नाही.प्रत्येकाने येणाऱ्या काळातील आरोग्याचा धोका लक्षात घेतला पाहिजे.दरवर्षी पडणारे पावसाच्या पाण्याचे योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढवले पाहिजे. पिण्याच्या पाण्याची योग्य साठवणूक केली पाहिजे. प्रत्येकाने पाणी खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.पाणी हे जीवन आहे.ते जीवापाड जपले तरच दिर्घकाळ टिकेल.
3) ध्वनि प्रदूषण
प्रदूषणामध्ये आधुनिक भेडसावणारी समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण होय.यामध्येसुद्धा विज्ञानाच्या प्रगतीचा विपर्यास झालेला दिसतोय.घराघरात आधुनिक साधने आली.व त्याचा अति वापर सुरू झाला.रेडिओ,टीव्ही, टेपरेकॉर्डर, मोबाईल,डीजे,वाहनांचा कर्कश हॉर्न यामुळे ध्वनी प्रदूषण अधिक होत आहे.मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होत असलेल्या ध्वनीच्या वापराने आरोग्यास धोका पोहचत आहे.शहरी भागात गर्दीच्या ठिकाणी वाहने पास करण्यासाठी मोठ्या कर्कश आवाजात हाॅर्न वाजविला जातो.अनेक जण एकाच वेळी हॉर्न वाजवित असतात. प्रत्येकाच्या जाण्याच्या घाईने निघालेला कर्कश आवाज मर्यादेपेक्षा जास्त निर्माण होतो.त्यातून ध्वनीचे प्रदूषण निर्माण होते.याचबरोबर लग्न समारंभ,सार्वजनिक उत्सव, जयंती यांच्या मिरवणुकीमध्ये बँड पथके आधुनिक डीजे सिस्टीम ठरवून दिलेल्या आवाजाच्या क्षमतेपेक्षा मोठ्यांनी वाजवतात.यातून निघणारा कर्कश आवाजाने अनेकांना कान, ह्रदयाचा त्रास होतो.सार्वजनिक ठिकाणी आवाजाची घालून दिलेले नियम जर योग्य पाळले नाही.तर मानवा बरोबरच पशुपक्ष्यांना सुद्धा याचा त्रास होतो.आज अनेक पक्षी नाहीसे होत आहे.याला प्रदूषण कारणीभुत आहे. मानवाला प्रदूषणाच्या परिणामातून वाचण्यासाठी दवाखान्याचा पर्याय उपलब्ध आहे.पण मानवा बरोबर इतर सजीवांना मात्र प्रदूषणाचे दुष्परिणामातून कोणीही वाचवू शकत नाही.मानवाने स्वतःच्या हट्टापायी सजीव व निसर्ग यांना धोका निर्माण केला आहे.आज सजीव व निसर्ग यांना अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे.कर्तव्या बरोबरच जबाबदारीचे पालन झाले.तर समस्या निर्माण होत नाही.समस्या निर्माण झाल्या नाही तर त्यावर उपाय शोधण्याची गरज भासत नाही.मानवच आपल्या चुकांमधून समस्या निर्माण करतो.व समस्या सुधारण्यासाठी शोधक वृत्तीचा वापर करतो.कुठे तरी या चक्रातून मानव बाहेर पडला पाहिजे.जे निसर्ग निर्मित आहे.त्याला नष्टही करायचे नाही.व त्याचा शोधही लावायचा नाही.निसर्गाच्या सानिध्यात चांगले जीवन व्यतित करायचे.निसर्गाचा व सजीवांचा स्नेह असाच अबाधित ठेवायचा.तरच मानवी जीवन संकट विरहित निर्माण होईल.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment