Monday, 27 July 2020

चला कोरोना विरुद्ध एकत्र लढुया

       चला कोरोना विरुद्ध एकत्र लढुया

कोरोना नावाची दहशत सध्या जगाने घेतली आहे. अनेक देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. यातच भारतात सुद्धा कोरोनाने हळूहळू आपला प्रसार वाढविला आहे. रोजच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोनाची दहशत प्रत्येक भारतीयांच्या मनावर आदळत आहे परंतु भारत हा असा देश आहे. ज्याला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. भारत इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक संकटावर मात करत पुढे आलेला आहे. भारताच्या इतिहासात डोकावले तर अनेक संकटे भारतात आली. व प्रत्येक संकटावर मात करत भारत आज ताठ मानेने जगाच्या स्पर्धेत टिकून आहे. अठराशे च्या दशकात सुरुवातीला इंग्रज भारतात आले व दीडशे वर्षे भारतावर राज्य गाजविले. संपूर्ण भारतात स्वतःचा प्रसार वाढविला. देशातील जनतेला गुलाम बनविले. देश लुटला जाऊ लागला. या संकटावर मात करण्यासाठी सुद्धा भारतातील जनता एकत्र आली. एकजुटीने या संकटाचा सामना करत राहिली. जनसामान्यांच्या स्वातंत्र्याच्या इच्छाशक्ती पुढे इंग्रज नतमस्तक झाले व भारत सोडून निघून गेले. भारत देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत भारत देश एकजुटीने, एकसंघतेने ताठपणे उभा आहे. स्वतंत्र भारताच्या 73 वर्षात अनेक छोट्या मोठ्या संकटावर मात करत आला आहे. आता सुद्धा कोरोना सारख्या विषाणूच्या विरुद्ध देश पुन्हा एकदा लढतोय. या लढ्यात संपूर्ण भारत देशातील जनता कोरोना च्या विरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी सज्ज आहे. फरक एवढाच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांना एकजुटीने रस्त्यावर उतरावे लागले होते. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने घरात थांबायचे आहे. केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाच्या आहे. गर्दी टाळणे, गरज नसताना घराच्या बाहेर न पडणे. समूहाने एकत्र न जमणे, स्वच्छतेच्या सवयी चे पालन करणे, लक्षणे जाणवताच त्वरीत डाॅक्टरांना दाखविणे. अशा गोष्टीचे पालन एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करायचे आहे. भारत हा सुसंस्कृत व संस्कारित देश आहे. येथे संस्कृतीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. भारताची ओळख संस्कृती व संस्कार आहे. हीच ओळख आपण कोरोनाच्या विरोधात दाखवण्याची गरज आहे. कोरोना सारखा विषाणूलाही देशाच्या जनतेच्या पुढे झुकायला लावणारी इच्छाशक्ती या देशात आहे. फक्त गरज आहे ती प्रत्येक नागरिकाने स्वतःमध्ये इच्छाशक्ती जागवण्याची. जगाच्या या संकटातून भारताला सहजपणे बाहेर काढण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. हे ओळखून प्रत्येकाने वागणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा भारत देशाला ताठपणे उभे राहण्यासाठी कोरोनाला हरविणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येकजण कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला, सरकारला मदत करूया. व भारतीय जनतेच्या इच्छाशक्ती पुढे कोरानाला पळवून लावू या.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...