2020 या नवीन वर्षाला सुरुवात झाली.संपूर्ण देशवासीयांनी नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले.याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोव्हीड 19 कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.हळूहळू कोरोनाने इटली,अमेरिका अशा अनेक देशांत पसरायला सुरुवात केली.जगात कोरोना संकट थैमान घालत आहे.या संकटात भारता सुद्धा ओढावला गेला.संपूर्ण देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.राज्य सरकार व केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.भारत हा एक कुटुंब आहे.आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते.त्याचप्रमाणे देशाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक राज्य शासन व केंद्र शासन घेत आहे.भारताच्या पंतप्रधानांनी 21 दिवसांसाठी संपुर्ण भारत देश लाॅक डाऊन केेले.कोरोना या विषाणूची कुठेतरी साखळी खंडित व्हावी यासाठी हे लॅाक डाऊन.प्रत्येक नागरिकांनी या काळात घरात थांबून देशाला सहकार्य करावे.असे आवाहन भारताच्या पंतप्रधानांनी केले.अर्थात ते प्रत्येकाच्या जिवित्वाच्या दृष्टीने फायद्याचे होते.जेव्हा जेव्हा देशावर संकटे येतात.तेव्हा देशातील अनेक माणसे पुढे येतात.स्वतःचे कुटुंब,कुटुंबातील सदस्य यांचा विचार न करता देशाच्या संकटाला हातभार लावण्यासाठी स्वतःची बाजी लावतात.यावेळेस सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या देशातील डॉक्टर्स,परिचारिका,वाॅर्ड बॉय,पॅथॉलॉजी डाॅक्टर,दवाखान्यातील सफाई कामगार, मेडिकल असोसिएशनचे कर्मचारी,पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी बांधव,मीडिया,पत्रकार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,कामगार बांधव पुढे आलेले आहे.या संकटावर मात करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. यामध्ये स्वतःच्या जिवाचा कुठेही विचार नाही.त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाचा,कुटुंबातील सदस्यांचा आई-वडिल, पत्नी,मुले यांचा विचार न करता.देशातील प्रत्येक कुटुंबासाठी,प्रत्येक नागरिकासाठी 24 तास हे सर्वजण झटत आहे.कोरोना सारख्या विषाणूची लागण होऊ नये.म्हणून प्रत्येकाने स्वतःला घरातच बंद करून घ्यायचे आहे.असे आवाहन सरकार व प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.परंतु या संकटाला सामोरे जात असताना स्वतः मात्र काळजी घ्यायला पुरेसा वेळ त्यांना नाही.याच काळात लोकांच्या रक्षणासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिवस-रात्र उभे आहे.राज्यात संचारबंदी लागू केली असताना सुद्धा लोक काही काम नसताना घराच्या बाहेर पडत आहे. यावेळी पोलिस बांधवांनी त्यांना अडवले.त्यांची चौकशी केली.त्यांना समजावले तर अनेक माणसातील अविचारी राक्षस याच बांधवांना विरोध करत आहे.पोलिस बांधवांना शिवीगाळ,मारहाण करत आहे.हे अतिशय निंदनीय कृत्य आहे.अनेक डॉक्टर्स आपण चुकीचे समजतो.वेळप्रसंगी शिवीगाळ करतो.मारहाण करतो.पण हेच डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण मेडिकल स्टाफ आज अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंण दिवस झटत आहे.स्वतःच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे देशातील प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी दवाखाना व मेडिकल यंत्रणेतील सर्वजण अतोनात प्रयत्न करत आहे. याचबरोबर देशातील संपूर्ण घटना,प्रत्येक हालचाल,नविन सुचना, उपाययोजना आपल्याला घरी बसून कळाव्या यासाठी मीडिया कर्मचारी व पत्रकार बांधव कोरोनाचा धोका पत्करून देशातील प्रत्येक गल्लीबोळात उभे आहेत.व प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे.याचबरोबर सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक लागणाऱ्या गोष्टी किराणा, भाजीपाला,बँक,पेट्रोल पंप या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व बांधव कोरोनाचा धोका पत्करून हजर आहेत.आजच्या घडीला भारतातील सर्व मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर आज बंद आहे.पण खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या संरक्षणासाठी मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर यातील देव डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टाफ,पॅथॉलॉजी डाॅक्टर,पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार,मीडिया,दवाखान्यातील सफाई कामगार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी बांधव यांच्या रूपाने जनसामान्यांसाठी झटत आहे.याक्षणी देवळातील देवा पेक्षा या माणसातील खरा देव ओळखण्याची गरज आहे.म्हणून प्रत्येक भारतीयांनी या माणंसातील देवाला सहकार्य केले पाहिजे.यांच्याप्रती ऋण व्यक्त केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने स्वतःतील माणुसकी जागृत केली पाहिजे. माणुसकीचे दर्शन घडवण्याची ही वेळ आहे. देशातील प्रत्येक माणसाने जन माणसाप्रती माणुसकीची भावना जागवली तरच कोरोना सारख्या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment