Saturday, 25 July 2020

|| हेंचि दान देगा देवा ||

|| हेंचि दान देगा देवा ||



              हेंचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
             गुण गाईन आवडी | हेंचि माझी सर्व जोडी ||

देहुचे महान संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे.तुकाराम महाराजांनी देवाकडे एकच दान मागितले आहे.पांडुरंगा तुझा विसर मला कधीच पडु देऊ नको.तुकाराम महाराज त्यागमुर्ती होते.त्यांनी सर्व सुखाचा त्याग करून पांडुरंगाची भक्ती केली.स्वतःच्या भक्तिमार्गाने पांडुरंगाचे परमभक्त झाले. सर्वसामान्य जन म्हणून आपण समाजात वावरतांना आपल्या भक्तीचा मार्ग ठरलेला आहे. जीवनात सुख आले तर भगवंताच्या नामाला विसरून जायचे. भगवंताची आठवणही काढायची नाही.याउलट जेव्हा संकट येते.तेव्हा मात्र पांडुरंगाचा धावा करायचा. देवाचे नामस्मरण करायचे.सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन मार्ग आहेत.संसाराच्या रथाला ही दोन चाके सदा सर्वदा जोडलेली आहे.सुख आणि दुःख हे सूर्याच्या ऊन सावली सारखे आहे.एकामागून एक येत राहतात.याउलट एकामागून एक जात राहतात.सामान्य मनुष्य मात्र सुख दुःखाचा फार विचार करत बसतो. मनुष्य जन्मात मागील कर्मानुसार वर्तमान जीवन मिळालेले असते.परंतु या वर्तमान जीवनात भगवंताची भक्ती करत राहिलो.सद विवेक बुद्धीनी चांगले कार्य करत राहिलो.तर निश्चितच भगवंत सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य मनुष्य हा स्वार्थ पोटी भक्तीचे सोंग आणतो. भक्तिचा मार्ग हा स्वार्थसाठी निवडतो. भगवंत हा स्वार्थासाठी नसून तो सत्य,प्रामाणिक निर्मळ मनाच्या भक्तीचा भुकेला आहे.संत तुकाराम महाराजांनी आयुष्यभर देवाची भक्ती केली.संसारातील सुख व दुःखाचा त्याग केला. सुखाचा कधी आनंद मानला नाही.तर दुःखाची कधी खंत करत बसले नाही.निर्मळ अंतकरणाने भगवंताची भक्ती करत राहिले.स्वतःच्या आयुष्यात भगवंताकडे सुईच्या टोकावर मावेल एवढा स्वार्थ कधी मागितला नाही.उलट देवाकडे असे मागणे मागितले की,भगवंत डोळ्यासमोरून, मुखातून, अंतकरणातुन कधी जाऊच नाही.संत यामुळे श्रेष्ठ आहे. भगवंताला स्वतः पेक्षाही अधिक संत प्रिय आहे.संत हे त्यागी होते.याउलट सामान्य मनुष्य जन कोणताच त्याग करायला तयार नाही.मनुष्य भक्तीच्या सुखापेक्षा संसाराच्या भौतिक सुखाच्या मागे धावत असतो.पैसा,प्रतिष्ठा,नातीगोती या सुखाच्या मोहात अडकून जातो.या मोहापायी भक्ती व भगवंत या दोन्ही पासून दूर जातो. आयुष्यात शेवटी दुःखाचा शिरकाव झाला की,मग भगवंताच्या चरणाशी लिन होण्याचा प्रयत्न करतो.आयुष्य खूप सुंदर आहे.ते आपल्याला सुंदर पणे जगता आले पाहिजे.आयुष्यात जगत असतांना ते प्रामाणिकपणे जगले पाहिजे.देणारा तोच आहे.त्याच्याकडे मागत बसुन फायदा नाही.योग्य वेळी हवे ते तोच देत असतो.देवाकडे मागतांना सुखाची मागणी करू नये.सुख हे क्षणीक असते.ते एक वेळ मनुष्य पासून दूर जाते.देवाकडे मागायचे असेल तर संत तुकाराम महाराजांनी मागितलेले दान मागूया.देवा तुझा विसर होऊ देऊ नको.तू सदैव भक्तीच्या नामाने मुखात,भक्तीच्या सुंदर रुपाने डोळ्यात,प्रेम भावनेने हृदयात,चांगल्या कर्तुत्वाने हातात,सदैव रहावा. तरच आयुष्यात माणूस म्हणून जगण्याला अर्थ उरेल.भक्ती व भगवंत या मार्गाची निवड केली तर,सुखाचे गाव यायला वेळ लागणार नाही.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...