जीवन जगतांना प्रत्येकाला सुंदर विचारांची गरज आहे. सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सुंदर विचारांनीच प्रत्येकाचा दिवस मार्गक्रमण करत असतो.सकाळी झोपेतून उठले की प्रार्थना,श्लोक म्हणूनच दिवसाची सुरुवात करावी. सकाळीच अंधारावर मात करत सुंदर प्रकाश किरणे घेऊन उगवणाऱ्या सूर्य देवाला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी.मग सकाळी आंघोळ करताना असेल की देव पूजन करताना असेल भगवंताचे स्मरण करून सुंदर विचारांनी दिवसाची सुरुवात झाली.की दिवस अतिशय आनंदी जातो.सुंदर विचारांनी सुरु होणारे काम सुंदर फळ रूपच पूर्ण होत असते.महाराष्ट्र संतांची भूमी असलेले राज्य आहे.समाजसुधारकांचा वसा असलेल्या या महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. समाजसुधारक,थोर विचारवंत, संत महात्म्य यांच्या विचारांनी दिवसाची सुरुवात व्हावी.कारण सुंदर विचार मनाला सुंदर बनवत असते.सुंदर मनच सुंदर कार्य करत असते.सुंदर कार्यच प्रत्येकांची ओळख निर्माण करत असते.सुविचार म्हणजे सुंदर विचार होय.हे सुंदर विचार महाराष्ट्रातील संत,समाजसुधारक, शास्त्रज्ञ,थोर विचारवंत यांच्या लेखन साहित्यातून आपल्याला मिळते.कथा, कादंबरी,अभंग,गवळण,भारुड आदी प्रकारातून सुंदर विचार आपल्याला मिळत असतात.या सुंदर विचारांना अंगीकृत केले पाहिजे.व सुंदर विचारांनी दिवसाची सुरुवात करावी.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment